शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रयतेचीही व्हावी सोय!

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर

अमरावती : केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर मार्गातून अचानक गायब झाले. निधीचा सुकाळ असावा अशा मानसिकतेने त्या परिसरात कामे करण्यात आलीत. साफसफाईसाठीही तरसणाऱ्या नागरिकांना ते सर्व स्वप्नवतच वाटत होते. मुख्यमंत्री आगमनाच्या वर्दीने हे सर्व घडत होते.हे अवघे राज्य चालविणारे मुख्यमंत्री याच राज्यातील आहेत. ते याच व्यवस्थेत वाढले आहेत. सामान्य नागरिक ज्या व्यवस्थेत राहतात त्या व्यवस्थेत मुख्यमंत्रीदेखील राहूच शकतात, इतके ते जमिनीशी जुळलेले आहेत! केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सामान्य नागरिकांनी पदरमोड करून भरलेल्या करापोटीचा निधी असा वारेमाप उधळण्याची खरच गरज होती काय? नम्र अन् शालिन स्वभावाचे, सामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी तशी अपेक्षा असेल काय? कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्याची सोय नसलेल्या महापालिकेला केवळ एका व्यक्तीच्या सोयीसाठी सामान्यांचा पैसा उधळताना एकदातरी विचार करायला नको होता काय? हा बडेजाव बघून 'लोकांच्या मुख्यमंत्र्यां'ची शाबासकी मिळविण्यात महापालिका यशस्वी होणार आहे काय? बालाजी प्लॉट परिसरात रस्ते झाले ती आनंदाचीच बाब झाली. त्यानिमित्ताने त्या परिसरातील लोकांची समस्या सुटली; तथापि त्या कार्यामागे लोकांची सुविधा करण्याचा जराही हेतू महापालिकेचा नव्हता. मानस होता तो मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा. आमचा सवाल महापालिकेच्या त्या मानसिकतेवर आहे. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य करदात्या सामान्यजनांची सोय करणे हे आहे. महापालिकेला हा विसर का पडावा? मुख्यमंत्री महोदय, अमरावतीकरांना जशी व्हीव्हीआयपी बघण्याची सवय झाली आहे ना, तशीच त्या व्हिव्हिआयपींसाठी सामान्यांचा पैसा खर्ची घालताना बघणेही अंगवळणी पडले आहे. माजी राष्ट्रपती आणि माजी राज्यपाल यांच्या काँग्रेसनगरातील निवासस्थानांसमोरील रस्ते असेच अचानक भलेमोठे, काळेशार अन् चकचकित झाल्याचे अमरावतकरांनी बघितले आहे. बगिच्यात झाडे नसतील परंतु या रस्त्यांवरची हिरवळ तळहातावरील फोडांप्रमाणे जपल्याचे अमरावतीकरांनी अनुभवले आहे. आमदारांच्या घरांसमोरील स्वच्छता अन् टापटीप नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सामान्यजन भरत असलेल्या करांचा उपयोग व्हिव्हिआयपींच्या सोईसाठी करायचाच असतो हे नेहमीचे समिकरण आपल्याबाबत मात्र अपेक्षित नव्हते. आपण 'जरा हटके' आहात. आपल्या रूपाने सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्याचा भास नागरिकांना होतो. आपल्यासाठी सर्वसामान्यांच्या पैशांची उधळण झाली नि आपल्या आगमनाइतकीच त्या मुद्याचीही शहरात चर्चा झडली. आपल्यासाठी जी सोय झाली ती अमरावतीतील आपल्या रयतेसाठीही व्हावी, इतकेच!