शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

रयतेचीही व्हावी सोय!

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर

अमरावती : केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर मार्गातून अचानक गायब झाले. निधीचा सुकाळ असावा अशा मानसिकतेने त्या परिसरात कामे करण्यात आलीत. साफसफाईसाठीही तरसणाऱ्या नागरिकांना ते सर्व स्वप्नवतच वाटत होते. मुख्यमंत्री आगमनाच्या वर्दीने हे सर्व घडत होते.हे अवघे राज्य चालविणारे मुख्यमंत्री याच राज्यातील आहेत. ते याच व्यवस्थेत वाढले आहेत. सामान्य नागरिक ज्या व्यवस्थेत राहतात त्या व्यवस्थेत मुख्यमंत्रीदेखील राहूच शकतात, इतके ते जमिनीशी जुळलेले आहेत! केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सामान्य नागरिकांनी पदरमोड करून भरलेल्या करापोटीचा निधी असा वारेमाप उधळण्याची खरच गरज होती काय? नम्र अन् शालिन स्वभावाचे, सामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी तशी अपेक्षा असेल काय? कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्याची सोय नसलेल्या महापालिकेला केवळ एका व्यक्तीच्या सोयीसाठी सामान्यांचा पैसा उधळताना एकदातरी विचार करायला नको होता काय? हा बडेजाव बघून 'लोकांच्या मुख्यमंत्र्यां'ची शाबासकी मिळविण्यात महापालिका यशस्वी होणार आहे काय? बालाजी प्लॉट परिसरात रस्ते झाले ती आनंदाचीच बाब झाली. त्यानिमित्ताने त्या परिसरातील लोकांची समस्या सुटली; तथापि त्या कार्यामागे लोकांची सुविधा करण्याचा जराही हेतू महापालिकेचा नव्हता. मानस होता तो मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा. आमचा सवाल महापालिकेच्या त्या मानसिकतेवर आहे. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य करदात्या सामान्यजनांची सोय करणे हे आहे. महापालिकेला हा विसर का पडावा? मुख्यमंत्री महोदय, अमरावतीकरांना जशी व्हीव्हीआयपी बघण्याची सवय झाली आहे ना, तशीच त्या व्हिव्हिआयपींसाठी सामान्यांचा पैसा खर्ची घालताना बघणेही अंगवळणी पडले आहे. माजी राष्ट्रपती आणि माजी राज्यपाल यांच्या काँग्रेसनगरातील निवासस्थानांसमोरील रस्ते असेच अचानक भलेमोठे, काळेशार अन् चकचकित झाल्याचे अमरावतकरांनी बघितले आहे. बगिच्यात झाडे नसतील परंतु या रस्त्यांवरची हिरवळ तळहातावरील फोडांप्रमाणे जपल्याचे अमरावतीकरांनी अनुभवले आहे. आमदारांच्या घरांसमोरील स्वच्छता अन् टापटीप नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सामान्यजन भरत असलेल्या करांचा उपयोग व्हिव्हिआयपींच्या सोईसाठी करायचाच असतो हे नेहमीचे समिकरण आपल्याबाबत मात्र अपेक्षित नव्हते. आपण 'जरा हटके' आहात. आपल्या रूपाने सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्याचा भास नागरिकांना होतो. आपल्यासाठी सर्वसामान्यांच्या पैशांची उधळण झाली नि आपल्या आगमनाइतकीच त्या मुद्याचीही शहरात चर्चा झडली. आपल्यासाठी जी सोय झाली ती अमरावतीतील आपल्या रयतेसाठीही व्हावी, इतकेच!