शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

- तर मनपा आयुक्तांविरुद्ध ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’!

By admin | Updated: November 6, 2016 00:08 IST

वारंवार पाठपुरावा करूनदेखील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन करण्यास महापालिकांनी चालढकल चालविल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन : महापालिकांना गर्भीत इशाराअमरावती : वारंवार पाठपुरावा करूनदेखील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन करण्यास महापालिकांनी चालढकल चालविल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. संबंधित महापालिका आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्यावरच न्यायालयाचा अवमान केल्याबाबत 'कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट' अ‍ॅक्ट १९७१ नुसार कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा देण्यात आला आहे. ‘पीटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील अपिल’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांन्वये अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्काशित करणे, नियमित करणे आणि स्थलांतरीत करण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने सुस्पष्ट धोरण ठरविले आहे. त्यानुसार जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील समितीने अंगिकारावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अमरावतीसह औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे या शहरांकरिता महापालिकास्तरीय समिती गठित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही राज्यातील या महापालिकांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कुठलीही कारवाई केली नाही.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत कारवाई होत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ८ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित, नियमित आणि स्थलांतरित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने २१ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयान्वये महानगरपालिका आणि उर्वरित क्षेत्रांमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत करावयाच्या कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला. ही कारवाई २१ आॅक्टोबर २०१५च्या पुढील नऊ महिन्यांच्या कारवाईत करावयाचे होते. मात्र, अद्यापपर्यंत राज्यातील बहुतांश धार्मिक स्थळे जैसे थे असल्याने उच्च न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, १६ फेब्रुवारी २०१५ रोजी नगरविकास विभागाने शासन निर्णय काढून राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकांनी कारवाई करावी तथा २९ सप्टेंबर २००९ नंतर उभी राहिलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या शासन निर्णयालाही महापालिकांनी केराची टोपली दाखविली. माध्यमांमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी घोषित करून त्यावर आक्षेप आणि हरकती मागणविण्यापूरतीच महापालिकेचा कार्यक्रम मर्यादित राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा ५ नोव्हेंबर २०१६ रोजी नगरविकास विभागाने मागील सर्व शासन निर्णयांची आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची उजळणी करीत महापालिकांना ३१ डिसेंबर २०१६ ची डेडलाईन दिली आहे. (प्रतिनिधी)असा आहे आदेशअनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याकरिता विहित केलेल्या मुदतीत २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची नियमित करावयाची, स्थलांतरित करावयाच्या आणि २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या निष्कासित करावयाच्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत कारवाई करण्यात आली नाही. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर कारवाई पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांची असेल. उर्वरित पावणे दोन महिन्यांत कारवाई पूर्ण न झाल्यास संबंधित महापालिका आयुक्त हे न्यायालयाचा अवमान केल्याबाबत कारवाईस पात्र ठरतील.तक्रार निवारण यंत्रणा उभारावीसार्वजनिक ठिकाणी नवीन धार्मिक स्थळ आवश्यक त्या परवानग्या मिळाल्याशिवाय उभारल्या जाणार नाहीत याची काळजी नियोजन प्राधिकरणाने घ्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणांच्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी तथा यापूर्वी किंवा आता निष्कासित करण्यात येणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पुन्हा असे स्थळ उभारल्यास ते तत्काळ निष्कासित करण्यात यावे, असे सुस्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.अनधिकृत धार्मिक स्थळांवरील निष्काशनाबाबत अन्य महापालिकांच्या तुलनेत अमरावती महापालिका अग्रेसर आहे. दरम्यान एका स्वतंत्र जनहित याचिकेवर निर्णय देताना निष्कासनाबाबत खंडपीठाने महापालिकेला वेगळी मुदतवाढ दिली आहे.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका