शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज

By admin | Updated: April 13, 2017 00:16 IST

तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे.

वीरेंद्र जगताप : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पणचांदूर रेल्वे : तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे. जंगले उजाड झाली तर त्याचा सरळ फटका पावसाला बसतो. पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चांदूररेल्वेचे नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, चांदूरेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, अमरावतीचे सहायक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) आर.जी.बोंडे, सहायक वनसंरक्षक ए.डब्ल्यू.कविटकर, चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे पिंपळाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, जंगली प्राणी शेतात शिरल्यामुळे त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून उत्पादनात देखील घट आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी हे कारण देखील असू शकते. त्यामुळे आत्महत्येच्या याकारणांचा समावेश करायला हवा. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनंत गावंडे, संचालन सदानंद पाचंगे तर आभार प्रसाद वाकोडे यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. वन्यपशुंचा उच्छाद रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊले तातडीने उचलण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)