शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाईचा एकमताने ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST

खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४ हजार ६६३ तक्रारींच्या अनुषंगाने शिवारातील पिकांची पाहणी कृषी विभागाने केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समिती सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये आणि बहुमोल परिश्रम वाया घालविणाºया बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाईचा ठराव शुक्रवारी एकमताने पारित करण्यात आला. या ठरावावर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुद्द्यांवर स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी, सदस्य आक्रमक झाले.खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४ हजार ६६३ तक्रारींच्या अनुषंगाने शिवारातील पिकांची पाहणी कृषी विभागाने केली. यामध्ये ३ हजार ४८ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले, तर १५४४ तक्रारी तथ्यहीन आढळल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी अनिल खर्चान यांनी ७ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद स्थायी समिती पदाधिकारी व सदस्यांनी विचारलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखी स्वरूपात दिली. विशेष म्हणजे, या तक्रारींमध्ये २ हजार २१ तक्रारी या महाबीजसंबंधी व उर्वरित तक्रारी खासगी कंपन्यांबाबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या नुकसानापोटी आतापर्यंत ८१२ शेतकऱ्यांना ८६७ बॅग सोयाबीन व ४८ लाख ६६ हजार २१२ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे या अहवालात नमूद आहे. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळाली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, सदस्य सुहासिनी ढेपे यांनी आक्रमक होत, हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही; शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यावर तातडीने कारवाई करावी, असा ठराव खुद्द अध्यक्षांनी सभागृहाचे पटलावर मांडला. सदर ठराव हा एकमताने स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. कंपन्यावर कारवाई व नुकसानभरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, अशा आशयाचा ठराव राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. एकूणच बोगस बियाण्याच्या मुद्द्यावर सभागृहात वादळी चर्चा झाली. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती दयाराम क ाळे, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य जयंत देशमुख, अभिजित बोके, सुनील डिके, नितीन गोंडाणे, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.सर्व डेटा पाठविलासोयाबीनच्या बोगस बियाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची चौकशी व त्याअनुषंगाने कृषी विभागाच्यावतीने महाबीजसह खासगी कंपन्यांचा बियाण्यांबाबतचा सर्व डेटा पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाºयांनी सभागृहात सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती