शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या चरख्याला आले मूर्तस्वरूप

By admin | Updated: September 1, 2015 00:01 IST

राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी चरख्यावर गृहउद्योग निर्माण करणारी संकल्पना मांडली होती.

जिल्हा खादी ग्रामोद्योगचा उपक्रम : राज्यात प्रथमच अमरावतीत प्रयोगअमरावती : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी चरख्यावर गृहउद्योग निर्माण करणारी संकल्पना मांडली होती. त्याच चरख्याला आज आधुनिकीकरणाची जोड देऊन सोलर चरखे तयार करण्यात आले असून गांधीजींच्या चरख्याला आज मूर्तस्वरुप आले आहे. जिल्हा खादी ग्रामोद्योगाच्या उपक्रमात जिल्ह्यात २२ गावांतील २२० महिलांची निवड करण्यात आली असून त्या माध्यमातून शेतकरी महिलांना उद्योगाची नवीन दिशा मिळाली आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातून प्रथमच जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उद्योजकांची बैठक घेऊन अमरावतीच्या टेक्सस्टाईल झोनमध्ये उद्योग उभारणीवर चर्चा केली. त्यावेळी गडकरी यांनी सोलर चरख्यातून गृहउद्योगाची घोषणा केली होती. तो उपक्रम खादी गामोद्योग महामंडळाने हाती घेतला असून रविवारी बचत भवनात महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस कंपन्यांकडे पाठविण्यात येत होता. मात्र, आता सोलर चरख्यातून कच्चा मालाचा पक्का माल गृहउद्योगातूनच महिला तयार करणार आहे. जिल्ह्यातील महिलांना घरबसल्या गृहउद्योग येईल. - प्रदीप चेचरे, खादी ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती.गांधींनी वर्धेतून सुरू केली होती मोहीममहात्मा गांधींनी १९१५ साली गुजरातमधील एका खेड्यात चरखा पाहिला होता. तेव्हा गांधींनी महाराष्ट्रातील वर्धेतून चरख्याची मोहीम सुरु केली होती. त्यावेळी गांधीची चरख्याचा प्रसार व प्रचार केला. तेव्हा चरखा देशभरातील गावागावामध्ये पोहचला होता. आज मूर्तस्वरूप देण्याचे कार्य अमरावतीमधील खादी ग्रामोद्योगने केले आहे. २३ वा गट तयारखादी ग्रामोद्योगामार्फत सोलर चरख्यातून महिलांचा गृहउद्योग करू शकणार आहे. त्याकरिता २२ गट तयार करून महिलांना कर्ज वाटप करण्यात येणार आहेत. कच्चा माल व पक्यां मालाची विक्री करण्यासाठी २३ गटांची निर्मीती करण्यात आली असून या सर्व गटांवर खादी ग्रामोद्योग देखरेख करणार आहे. २२ गावांची निवडअमरावती : स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित माल तयार करून येथेच उद्योग सुरू करावेत, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. ही बाब हेरून जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी वर्धेतील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिककीरण संस्थेला भेट दिली. संस्थेने तयार केलेल्या सौर ऊर्जेवरील चरख्यांची पाहणी चेचरे यांनी करुन तेथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सोलर चरख्यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्ह्यातील महिलांना गृहउद्योगातून चालना मिळण्याचे संकेत प्रदीप चेचरे यांना दिसले. त्यामुळे चेचरे यांनी सोलर चरख्याबाबत नितीन गडकरी व उद्योगमंत्री यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. त्यानंतर हा उपक्रम जिल्हा खादी ग्रामोद्योगाकडे आला. खादी ग्रामोद्योग केंद्राने जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांतील प्रत्येकी दोन अशा २२ गावांची निवड करण्यात आली. आमदार व खासदारांनी आदर्श ग्राम दत्तक योजना राबविलेल्या गावांना प्राधान्य देऊन २२० महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना ५० हजारांचे वैयक्तिक कर्ज देण्यात येत येणार आहे. त्याकरिता खादी ग्रामोद्योग केंद्राने महिलांच्या कर्जाचे प्रारूप संबंधित बँकांंकडे पाठविले आहे. त्यामध्ये १० हजारांचे अनुदान खादी महामंडळ देणार आहे. हा उपक्रम राबविताना एका गावातील १० महिलांना एकाच शेडखाली काम करावे लागणार आहे. या महिलांना वर्धेतील संस्थेमार्फत प्रशिक्षणसुध्दा देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)