शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
3
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
5
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
6
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
7
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
8
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
9
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
10
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
11
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
12
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
13
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
14
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
15
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
16
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
17
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
18
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
19
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
20
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची मजिप्रावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:57 IST

धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एकदिवसाआड व अवेळी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधी स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेतात.

ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांचे नेतृत्व : कारभार ढासळल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एकदिवसाआड व अवेळी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधी स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेतात. सत्ता त्यांची आहे, तर शहरातील रखडलेल्या अमृत योजना व भुयारी गटार योजना का पूर्ण झाली नाही, असा सवाल करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसने शुक्रवारी मजीप्रावर धडक दिली. अधिकाऱ्यांशी यावेळी दोन तास चर्चा करून जाब विचारण्यात आला. यामुळे वातावरण तापले होते.माझ्या कार्यकाळात केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांनी यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत १०५.६० कोटी रुपयांची योजना अमरावतीकरिता मंजूर केली होती. यापैकी १४.२९ कोटी रुपयांचीच कामे राहिली होती. सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणामध्ये शहराकरिता ५८.३ दलघमी पाणी आरक्षित असूनसुद्धा शहरामध्ये प्रचंड पाणीटंचाई आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मूळ योजनेचे नामकरण अमृत योजना करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित होते. ती कामेही आॅक्टोबर २०१८ पुर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना पूर्ण झाली नाही, असा जाब रावसाहेब शेखावत यांनी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार व उपअभियंता सतीश बक्षी यांना केला. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य अकार्यक्षमतेमुळे व दिरंगाईमुळे शहरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ८३ कोटींच्या निविदेमधून कंत्राटदाराने लावलेल्या ११२ एअर व्हॉल्व्हपैकी ८७ निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. कंत्राटदाराला यासंदर्भात खुलासा मागविण्यात आला. मात्र, कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, यावर अधिकाºयांनी चुप्पी साधली. यावेळी माजी महापौर विलास इंगोले, महापालिका विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, शहर काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर यांनीसुद्धा अपूर्ण कामांवर अधिकाºयांना धारेवर धरले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.महिला काँग्रेस अध्यक्ष देवयानी कुर्वे, वसंतराव साऊरकर, माजी महापौर वंदना कंगाले, अभिनंदन पेंढारी, पुरुषोत्तम मुंधडा, राजू भेले, राहूल तायडे, सलीम मरावाळे, जयश्री वानखडे, तुजाज पहेलवान, बंडू हिवसे, सुरेंद्र देशमुख, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, राजाभाऊ चौधरी, संतोष देशमुख, अब्दुल वलीद, कुंदा अनासाने, किरण मेहरे यांच्यासह अनेक पदाधिकाºयांची उपस्थिती होती.भुयारी गटार योजना केव्हा पूर्ण होणार?पावसाळा तोंडावर असताना भुयारी गटार योजना अपूर्ण असल्याने नाल्यांमध्ये पाणी साचणार असून, विविध प्रकारच्या आजारांचा प्रकोप होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न रावसाहेब शेखावत यांनी विचारला. पहिल्या टप्प्यात एकूण २४६४० घरे योजनेला जोडणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत फक्त ७६० घरे जोडण्यात आली. उर्वरीत घरे या योजनेला केव्हा जोडणार, असा सवाल त्यांचा होता.

टॅग्स :congressकाँग्रेस