शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

'सत्ता मिळाली नाही तर ‘ते’ वेडे होतील!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:02 IST

पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील.पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह यावेळी उपस्थित होते.महाराजस्व अभियानासारखी शिबिरे सुरू करून ‘शासन आपल्या दारी’ आणल्याचे खोत म्हणाले. 

वरूड (अमरावती) : पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह यावेळी उपस्थित होते.

सन २०२२ पर्यंत शेतकरी स्वयंभू झाला पाहिजे. १५ वर्षे सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी राजेशाही थाटात राहून स्वत: मालक आणि जनता गुलाम बनविली. त्यांनी शाळा-महाविद्यालये, कारखाने काढले. परंतु, या साडेचार वर्षांच्या काळात आमच्या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, असा दावा त्यांनी केला. आम्ही आमच्या वाहनावरील लाल दिवे हटविले आणि जनतेला राजा समजून काम करायला लागलो. म्हणून विकासाचा टक्का वाढला. महाराजस्व अभियानासारखी शिबिरे सुरू करून ‘शासन आपल्या दारी’ आणल्याचे खोत म्हणाले. 

वरूडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, उपाध्यक्ष मनोज गुल्हाने, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, वसुधा बोंडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, गटविकास अधिकारी विजयसिंह राठोड, सुभाष बोपटे, माजी बालकल्याण सभापती अर्चना मुुरुमकर, पं.स. सदस्य अर्चना तुमराम, प्रमोद खासबागे, नलिनी रक्षे, शशिकांत उमेकर, इंद्रभूषण सोंडेंसह आदी उपस्थित होते.कोल्हे दाम्पत्याचा सत्कार 

मेळघाटात सामाजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र  व डॉ. स्मिता कोल्हे  या दाम्पत्यासह झटामझीरी, पिंपळखुटा या ग्रामपंचायतींना वॉटर कप स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Amravatiअमरावतीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी