शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:41 IST

भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.तालुका काँग्रेस कमिटीच्या निवेदनानुसार अमरावती, भातकुली तालुक्यात पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप भातकुली तालुक्यांतील विविध गावातील शेतशिवारात पावसाअभावी पेरणी झाली नाही. दोन्ही तालुक्यांत जी पेरणी झाली आहे, त्यामधील ४० टक्के पेरणी साधली. ६० टक्के बाधित झाल्यामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात दुबार पेरणीची वेळ निघून गेली. जी पेरणी साधली, त्यात २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पाण्याअभावी शेतात खांडण्या पडल्या आहेत. अमरावती तालुक्यात उष्ण वातावरणामुळे संत्राबागासुद्धा वाळल्या आहेत. ही भयावह स्थिती लक्षात घेता शासनाने अमरावती व भातकुली तालुक्यात तात्काळ सर्र्वेक्षण सुरू करावे, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी व बियाणे देण्यात यावे, सरसकट पीक विमा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, खरीप हंगाम २०१९ पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतीसाठी विद्युत पुरवठा अखंडित देण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. यावेळी बांधकाम सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, वीरेंद्रसिंह जाधव, मुकदरखाँ पठाण, हरीश मोरे, गजानन राठोड, बंडू पोहोकार, अभय देशमुख, नीलेश कडू, भुगूल, हिंमत मंडासे, शेखर अवघड, सौरभ किरकटे, संजय खोडस्कर यांच्यासह पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस