शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

शासनाविरूध्द काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय

अमरावती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. केंद्र व राज्य शासनाच्या जनहित विरोधी निर्णयांच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, संजय खोडके, सुधाकर गणगणे, यशोमती ठाकूर, संजय अकर्ते, केवलराम काळे, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींनी केले. शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. डिझेल व पेट्रोलचे दर नियमानुसार ५० टक्के कमी न करता केंद्र शासनाने जनतेची लूट केली आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा भूमिअधिग्रहण कायदा लागू करुन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊन केंद्र शासनाने जनतेची फसवणूक चालविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अन्नसुरक्षा अंशदानाला कात्री लावल्याने राज्यातील १ कोटी ७७ लाख गोरगरीबांवर अन्याय होणार आहे. याशिवाय घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या सवलतीत कपात करुन जनतेवर आर्थिक भार लादला आहे. केंद्र व राज्य शासनाने घेतलेले हे जनहितविरोधी निर्णय त्वरित रद्द करावेत, यासाठी जिल्हा काँग्रेस कमितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरवरुन येणारी व अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली.