शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शासनाविरूध्द काँग्रेस रस्त्यावर

By admin | Updated: February 9, 2015 23:04 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय

अमरावती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. केंद्र व राज्य शासनाच्या जनहित विरोधी निर्णयांच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, संजय खोडके, सुधाकर गणगणे, यशोमती ठाकूर, संजय अकर्ते, केवलराम काळे, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींनी केले. शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. डिझेल व पेट्रोलचे दर नियमानुसार ५० टक्के कमी न करता केंद्र शासनाने जनतेची लूट केली आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा भूमिअधिग्रहण कायदा लागू करुन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊन केंद्र शासनाने जनतेची फसवणूक चालविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अन्नसुरक्षा अंशदानाला कात्री लावल्याने राज्यातील १ कोटी ७७ लाख गोरगरीबांवर अन्याय होणार आहे. याशिवाय घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या सवलतीत कपात करुन जनतेवर आर्थिक भार लादला आहे. केंद्र व राज्य शासनाने घेतलेले हे जनहितविरोधी निर्णय त्वरित रद्द करावेत, यासाठी जिल्हा काँग्रेस कमितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरवरुन येणारी व अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली.