शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नियोजनाचा अभावाने सावळागोंधळ, २० टक्केच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत ...

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे रोज अर्धेअधिक केंद्रे बंद राहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत २० टक्केच लसीकरण झाले आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा मनस्ताप होत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पुरवठ्यात सातत्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी केंद्रे नेहमी बंद राहतात. आतापर्यंत मागणीच्या तुलनेत अर्धाच म्हणजे ५,७६,६४० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कोविशिल्ड ४,५२,६३० व कोव्हॅक्सिनचे १,२४,०१० डोस प्राप्त आाहेत. यामध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या सद्यस्थितीत ३० लाखांचे घरात आहे. त्यामुळे झालेले लसीकरण हे १९.४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. लसीकरणाची अशीच मंदगती राहिल्यास २०२२ मध्येही लसीकरण पूर्ण होणार की नाही, याबाबत नागरिक साशंक आहेत.

पाईंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ५८२,२०७

अमरावती महापालिका क्षेत्र : १,९९,१६७

ग्रामीणमधील लसीकरण : ३,८३,०४०

पाईंटर

लसीचा पुरवठा : ५,७६,६४०

कोविशिल्ड : ४५२,६३०

कोव्हॅक्सिन : १,२४,०१०

बॉक्स

असे झाले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ३५,०९४, फ्रंट लाईन वर्कर ५४,९८५, १८ ते ४४ वयोगटात ४७,३४९, ४५ ते ५९ वयोगट २,०८,८१६ तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक २,३५,९६३ असे एकूण ५,८२,२०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ४,३६,५५० व दुसरा डोज १,४५,६५७ नागरिकांनी घेतला असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

बॉक्स

ग्रामीणमध्ये माहितीच मिळत नाही

आरोग्य विभागाद्वारा रात्री नियोजन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लसीकरणाला सुरुवात होते. यामध्ये कुठल्या केंद्रांवर, कोणत्या वयोगटात, कोणत्या लसीचा, कोणता डोस देण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे नागरिक केंद्रांवर जातात व त्यांना आवश्यक असणारा डोस उपलब्ध नसल्यामुळे माघारी परत येत असल्याचे वास्तव आहे.