शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नियोजनाचा अभावाने सावळागोंधळ, २० टक्केच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत ...

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे रोज अर्धेअधिक केंद्रे बंद राहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत २० टक्केच लसीकरण झाले आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा मनस्ताप होत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पुरवठ्यात सातत्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी केंद्रे नेहमी बंद राहतात. आतापर्यंत मागणीच्या तुलनेत अर्धाच म्हणजे ५,७६,६४० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कोविशिल्ड ४,५२,६३० व कोव्हॅक्सिनचे १,२४,०१० डोस प्राप्त आाहेत. यामध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या सद्यस्थितीत ३० लाखांचे घरात आहे. त्यामुळे झालेले लसीकरण हे १९.४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. लसीकरणाची अशीच मंदगती राहिल्यास २०२२ मध्येही लसीकरण पूर्ण होणार की नाही, याबाबत नागरिक साशंक आहेत.

पाईंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ५८२,२०७

अमरावती महापालिका क्षेत्र : १,९९,१६७

ग्रामीणमधील लसीकरण : ३,८३,०४०

पाईंटर

लसीचा पुरवठा : ५,७६,६४०

कोविशिल्ड : ४५२,६३०

कोव्हॅक्सिन : १,२४,०१०

बॉक्स

असे झाले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ३५,०९४, फ्रंट लाईन वर्कर ५४,९८५, १८ ते ४४ वयोगटात ४७,३४९, ४५ ते ५९ वयोगट २,०८,८१६ तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक २,३५,९६३ असे एकूण ५,८२,२०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ४,३६,५५० व दुसरा डोज १,४५,६५७ नागरिकांनी घेतला असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

बॉक्स

ग्रामीणमध्ये माहितीच मिळत नाही

आरोग्य विभागाद्वारा रात्री नियोजन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लसीकरणाला सुरुवात होते. यामध्ये कुठल्या केंद्रांवर, कोणत्या वयोगटात, कोणत्या लसीचा, कोणता डोस देण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे नागरिक केंद्रांवर जातात व त्यांना आवश्यक असणारा डोस उपलब्ध नसल्यामुळे माघारी परत येत असल्याचे वास्तव आहे.