शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाचा अभावाने सावळागोंधळ, २० टक्केच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत ...

अमरावती : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाचा सावळागोंधळ अजूनही संपलेला नाही. ऐनवेळी लस व डोस यांचे नियोजन ठरत असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. लसीच्या पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे रोज अर्धेअधिक केंद्रे बंद राहत आहेत. त्यामुळे आतापर्यंत २० टक्केच लसीकरण झाले आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा मनस्ताप होत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पुरवठ्यात सातत्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी केंद्रे नेहमी बंद राहतात. आतापर्यंत मागणीच्या तुलनेत अर्धाच म्हणजे ५,७६,६४० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कोविशिल्ड ४,५२,६३० व कोव्हॅक्सिनचे १,२४,०१० डोस प्राप्त आाहेत. यामध्ये आतापर्यंत ५ लाख ८२ हजार २०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या सद्यस्थितीत ३० लाखांचे घरात आहे. त्यामुळे झालेले लसीकरण हे १९.४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. लसीकरणाची अशीच मंदगती राहिल्यास २०२२ मध्येही लसीकरण पूर्ण होणार की नाही, याबाबत नागरिक साशंक आहेत.

पाईंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ५८२,२०७

अमरावती महापालिका क्षेत्र : १,९९,१६७

ग्रामीणमधील लसीकरण : ३,८३,०४०

पाईंटर

लसीचा पुरवठा : ५,७६,६४०

कोविशिल्ड : ४५२,६३०

कोव्हॅक्सिन : १,२४,०१०

बॉक्स

असे झाले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ३५,०९४, फ्रंट लाईन वर्कर ५४,९८५, १८ ते ४४ वयोगटात ४७,३४९, ४५ ते ५९ वयोगट २,०८,८१६ तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक २,३५,९६३ असे एकूण ५,८२,२०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस ४,३६,५५० व दुसरा डोज १,४५,६५७ नागरिकांनी घेतला असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

बॉक्स

ग्रामीणमध्ये माहितीच मिळत नाही

आरोग्य विभागाद्वारा रात्री नियोजन करण्यात येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लसीकरणाला सुरुवात होते. यामध्ये कुठल्या केंद्रांवर, कोणत्या वयोगटात, कोणत्या लसीचा, कोणता डोस देण्यात येणार आहे, याची माहिती नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे नागरिक केंद्रांवर जातात व त्यांना आवश्यक असणारा डोस उपलब्ध नसल्यामुळे माघारी परत येत असल्याचे वास्तव आहे.