शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:27 IST

एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.

- मोहन राऊत

अमरावती - एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे.अभियांत्रिकी क्षेत्राकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व सदर महाविद्यालये डबघाईस आले आहेत. या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती शासनाने प्रथम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.याविरुद्ध मुंबई व पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. सदर शिष्यवृत्ती महाविद्यालय किवा संबंधित शिक्षण संस्थांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व भारती डांगरे यांनी दिला होता. एक महिन्याच्या आत संबंधित महाविद्यालयांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. मात्र, अध्यापही राज्यातील या महाविद्यालयांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. वर्ष संपले असून शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. तसेच ईबीसीचा लाभ घेणाºया विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. त्यांचे शुल्क हे शासन भरते. हे शुल्क व शिष्यवृत्ती महाविद्यालयांना वर्षाच्या अखेरीस मिळत नाही. प्राध्यापकांना आठ ते दहा महिने वेतनही देणे कठीण झाल्यामुळे महाविद्यालय चालवावे कसे, प्रश्न पडतो.  - एल.पी. धामंदे, प्राचार्य, धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय