शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

प्रेमसंबंधांत धर्मांतरणासाठी डांबल्याची अमरावतीमधील तरुणीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 09:56 IST

प्रेमसंबंध प्रस्थापित करून अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि धर्मांतरणासाठी डांबून ठेवल्याची तक्रार येथील फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आली.

ठळक मुद्देआरोपीला अटकअपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी, अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रेमसंबंध प्रस्थापित करून अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि धर्मांतरणासाठी डांबून ठेवल्याची तक्रार येथील फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी फईम अब्दुल जाकीर अब्दुल (२२, रा. राहुलनगर) याला तात्काळ अटक केली आहे.युवतीच्या तक्रारीनुसार, फईम अब्दुल याने काही वर्षांपूर्वी पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून जबरीने विवाह केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून धमकाविणे सुरू केले. जातिवाचक शिवीगाळ केली. बौद्ध धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी धाक दाखविला. धर्मांतरणासाठी घरात डांबून ठेवले. मारण्याच्या धमक्या दिल्या. तिच्या आई-वडिलांच्या आजाराचा फायदा घेऊन घरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीतून केला आहे. पोलिसांनी आरोपी फईम अब्दुलविरुद्ध भादंविचे कलम ३६३ (अपहरण करणे), ३६६ (पळवून नेऊन धमकी देणे), ३४१ (प्रतिबंध करून डांबून ठेवणे), २९५ (अ) (धार्मिक भावना दुखावणे), ३७६ (अ) (जबरी संभोग), ३८४ (खंडणी), ५०६ (धमकविणे) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (२) अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. इच्छेविरुद्ध धर्मांतरण करण्यासाठीचा गुन्हा अद्याप नोंदविण्यात आला नाही.तपास ठाणेदारांकडून माझ्याकडे आला आहे. इतर गुन्हे दाखल आहेतच. धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचीही तक्रार आहे. दाखल गुन्ह्यांमध्ये ते कलम लावलेले नाही. कलमांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते.- पी.डी. डोंगरदिवे, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हा