शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

ग्रामपंचायतींच्या चौकशीसाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

अमरावती: जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या निर्णयानुसार सीईओंकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चौकशी आदेशातील सदस्यांचा उल्लेख ...

अमरावती: जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या निर्णयानुसार सीईओंकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चौकशी आदेशातील सदस्यांचा उल्लेख असलेला मजकूर वगळून आता मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींची चौकशी करण्यासाठी सात विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सुधारित आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील काही ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांत अनियमितता झाल्याची तक्रार गत सप्टेंबर महिन्यात प्राप्त झाली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने सीईओंनी २८ डिसेंबर रोजी तक्रार असलेल्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. मात्र, या आदेश तक्रारीतील संदर्भ देत झेडपी सदस्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यावर मेळघाटातील नऊ सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे स्थायी समितीत मेळघाटातील सदस्य संतापले होते. अखेर आक्षेप असलेला मजकूर काढून नव्याने ग्रामपंचायतींच्या चौकशीसाठी सुधारित आदेश काढण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार पदाधिकारी व सदस्यांच्या सूचनेप्रमाणे नवीन चौकशी समितीचा गठित करून सुधारित आदेश काढून आता तक्रार असलेल्या ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्याची सात विस्तार अधिकारी चौकशी करणार आहेत. यात चिखलदरा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी तीन आणि धारणी तालुक्यातील १३ ग्रामंचायतींची चौकशी चार विस्तार अधिकारी करणार आहेत.

बॉक्स

चौकशी अधिकारी व ग्रामपंचायती या प्रमाणे

मोर्शी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.एस. भिवगडे हे माखला, भुलोरी, वरूडचे आर.एन. कांबळे हे रायपूर, सेमाडोह, तिवस्याचे ए.आर. रामटेके हे लवादा आणि खडीमल, दर्यापूरचे ए.एन. कुलकर्णी हे कुटंगा, चौराकुंड, बोबदो, अमरावतीचे जे.एच. देशमुख हे दिया, सालई, गोंडवाडी, चांदूर रेल्वेचे एच.जे. चव्हाण हे झापल, बिजुधावडी, गोलाई, गोंडवाडी आणि अंजनगाव सुनील गवई हे बेरदा बल्ङा,साद्राबाडी व टिटंबा ग्रामपंचायतीमधील कामाची चौकशी करणार आहेत.

कोट

स्थायी समितीत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे यापूर्वीचा चौकशी समितीचा आदेशामधील आक्षेप असलेला संदर्भ वगळून नवीन सुधारित आदेश काढलेला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मेळघाटातील ग्रामपंचायतींची चौकशी विस्तार अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. यासंदर्भात अहवाल आल्यानंतर कारवाईबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी