शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आयोगाचं ठरलं; आचारसंहिता लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब

By गणेश वासनिक | Updated: March 15, 2024 16:39 IST

मात्र राज्यात १० हजार बसेसवर शासनाचा उदोउदो, नेत्यांची छायाचित्रे असलेल्या योजनांची जाहिरात कशी हटविणार, हा मोठा गंभीर प्रश्न उद्‌भवणार आहे.

अमरावती : लोकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता शनिवार,१६ मार्च रोजी दुपारनंतर लागू होणार आहे. त्यामुळे मंत्रालय, प्रशासकीय विभागांनी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. आचारसंहिता प्रत्यक्ष लागू झाल्याच्या दिवशीच ही कार्यवाही तातडीने करावी लागणार आहे. मात्र राज्यात १० हजार बसेसवर शासनाचा उदोउदो, नेत्यांची छायाचित्रे असलेल्या योजनांची जाहिरात कशी हटविणार, हा मोठा गंभीर प्रश्न उद्‌भवणार आहे.

ऐन मार्च एंडींगच्या धामधुमीत शासकीय अधिकारी- कर्मचारी निवडणुकीच्या कार्यावर तैनात करण्यात आल्यामुळे नोकरशाहाच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी झाले आहे. सध्या मार्च महिन्यात येणारा निधी कसा आणि कसा खर्च घालावा यात अनेक कार्यालयाचे बाबू फाईलमध्ये तोंड खुपसून बसलेले आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ७ मार्च रोजी पत्र काढून मंत्रालय, प्रशासकीय विभाग आणि विभागीय तसेच तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या कार्यालयात नेत्यांच्या तसबीरी काढण्याचे फर्माने सोडलेले आहेत. अजुनपर्यंत अनेक विभागातील नेत्यांच्या तसबिरी, विकास कामांच्या उद्घाटनाचे नामफलक झाकण्याचे कामयुद्ध पातळीवर सुरु झालेले नाही, हे वास्तव आहे.

निवडणुक आयोगाचे फर्मान

सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ७ मार्च रोजी सर्व विभागांना पत्र देवून काेणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास अशी छायाचित्रे त्वरित हटविण्याचे निर्देश दिलेले आहेत. आचारसंहिता काळात आणि त्यानंतर पूर्ण प्रक्रिया होईस्तोवर तसबीरी कार्यालयात लावता येणार नाही, असे दिसून आल्यास अधिकारी घरी जाणार असा दम भरण्यात आलेला आहे.

एसटी रस्त्यावर, जाहिरात हटविणार कोण?

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने शासकीय कार्यालये, वाहने, यावरच असलेली नेत्यांचे फोटो, सरकारी जाहिरात काढण्याचे आदेश दिलेले असतानाच महाराष्ट्राची लालपरी परिवहन महामंडळाची बस मात्र जोरकसपणे राज्य शासनाची जाहिरात असलेले फलक घेवून गावो-गावी, शहरात जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील सुमारे १० हजार बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूने मंत्र्यांच्या फोटोसह राज्यातील ४९ विभागांच्या जाहिराती दिसून येत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करून जाहिरात करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसवर असलेल्या नेत्यांच्या जाहिराती मात्र आदर्श आचार संहितेचा भंग करणार आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकAmravatiअमरावती