शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

रानमाळावर 'फ्लेम ऑफ द फायर'चा रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:50 IST

वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.

- अमित कांडलकर

गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.'फ्लेम ऑफ द फायर' असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले आहे. तो सध्या संपूर्ण रानमाळावर बहरला असून, होळीनिमित्त त्याच्यापासून तयार रंगाची उधळण केली जाते. शिषिर ऋतूमधील हवेतला गारवा जाऊन पानगळीने उघडे पडलेली वनसंपदा पळस फुलाच्या सौंदयाने रंगउधळण करतांना लक्ष वेधून घेते.संस्कृतीमध्ये पळस फुलांना पलाश म्हणतात. याचा अर्थच फुलांनी डवरलेले झाड, असा होतो. पळसाची फुले सरस्वती माता आणि कालिमातेला भक्तिभावाने अर्पण करण्याची पद्धती आहे. त्याच्या नावावरच 'कुठेही गेला तरी पळसाला पाने तीनच' अशी म्हण प्रचलित आहे. तोच पळस बहुगुणी असून, त्याच्या फुलांचा उपयोग होळीमध्ये रंग बनविण्यासाठी होतो. पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी केला जातो. पळस हा खडकाळ भागात अथवा शेताच्या धु-यावर वाकड्या स्थितीत आढळतो. त्याची उंची मध्यम असते. झाडाची संपूर्ण पाने गळून गेल्यानंतर पळसाच्या झाडाला फुलांचे घुमारे फुटतात. सद्यस्थितीत निसर्गामध्ये केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाची फुले आढळून येत आहेत. त्याची अनेक औषधी गुणधर्म असून, त्याच्यापासून तयार केलेल्या पाण्यात आंघोळ केल्यास अनेक त्वचारोग नाहीसे होतात. तसेच त्याच्या बियांचा आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग होतो, असे आयुर्वेदात नमूद आहे.

पळस पानांचा पुन्हा भाग्योदय निश्चित..! पळसाच्या पानाचा आकार मोठा असल्याने त्यापासून उत्तम पत्रावळी तयार करता येते. त्यावर केलेले अन्नग्रहण शरीरास उपयुक्त ठरते. तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे या पळसाच्या पानापासून पत्रावळी बनविणारा मोठा कारागीर वर्ग आहे. याचा वापर वाढवावा, जणेकरून थर्मोकोल, प्लास्टिक कोटींगच्या जीवघेण्या पत्रावळी बाद होतील. थर्मोकोल,  प्लास्टिक कोटींगच्या पत्रावळीमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ शकतो, असे इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात नमूद आहे. थर्मोकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यास त्यातील 'स्टायरीन' नामक विष अन्नात मिक्स होऊन अपाय होण्याची शक्यता असते.

थर्माेकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यामुळे पालीस्टायरीन निर्माण होते. ते अन्न पचविण्यास जड जाते. त्यामुळे किडनीचे आजार होतात.- प्रा. सचिन आगीवाल, आयुर्वेदिक महाविद्यालय

टॅग्स :Amravatiअमरावती