शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रानमाळावर 'फ्लेम ऑफ द फायर'चा रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:50 IST

वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.

- अमित कांडलकर

गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.'फ्लेम ऑफ द फायर' असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले आहे. तो सध्या संपूर्ण रानमाळावर बहरला असून, होळीनिमित्त त्याच्यापासून तयार रंगाची उधळण केली जाते. शिषिर ऋतूमधील हवेतला गारवा जाऊन पानगळीने उघडे पडलेली वनसंपदा पळस फुलाच्या सौंदयाने रंगउधळण करतांना लक्ष वेधून घेते.संस्कृतीमध्ये पळस फुलांना पलाश म्हणतात. याचा अर्थच फुलांनी डवरलेले झाड, असा होतो. पळसाची फुले सरस्वती माता आणि कालिमातेला भक्तिभावाने अर्पण करण्याची पद्धती आहे. त्याच्या नावावरच 'कुठेही गेला तरी पळसाला पाने तीनच' अशी म्हण प्रचलित आहे. तोच पळस बहुगुणी असून, त्याच्या फुलांचा उपयोग होळीमध्ये रंग बनविण्यासाठी होतो. पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी केला जातो. पळस हा खडकाळ भागात अथवा शेताच्या धु-यावर वाकड्या स्थितीत आढळतो. त्याची उंची मध्यम असते. झाडाची संपूर्ण पाने गळून गेल्यानंतर पळसाच्या झाडाला फुलांचे घुमारे फुटतात. सद्यस्थितीत निसर्गामध्ये केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाची फुले आढळून येत आहेत. त्याची अनेक औषधी गुणधर्म असून, त्याच्यापासून तयार केलेल्या पाण्यात आंघोळ केल्यास अनेक त्वचारोग नाहीसे होतात. तसेच त्याच्या बियांचा आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग होतो, असे आयुर्वेदात नमूद आहे.

पळस पानांचा पुन्हा भाग्योदय निश्चित..! पळसाच्या पानाचा आकार मोठा असल्याने त्यापासून उत्तम पत्रावळी तयार करता येते. त्यावर केलेले अन्नग्रहण शरीरास उपयुक्त ठरते. तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे या पळसाच्या पानापासून पत्रावळी बनविणारा मोठा कारागीर वर्ग आहे. याचा वापर वाढवावा, जणेकरून थर्मोकोल, प्लास्टिक कोटींगच्या जीवघेण्या पत्रावळी बाद होतील. थर्मोकोल,  प्लास्टिक कोटींगच्या पत्रावळीमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ शकतो, असे इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात नमूद आहे. थर्मोकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यास त्यातील 'स्टायरीन' नामक विष अन्नात मिक्स होऊन अपाय होण्याची शक्यता असते.

थर्माेकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यामुळे पालीस्टायरीन निर्माण होते. ते अन्न पचविण्यास जड जाते. त्यामुळे किडनीचे आजार होतात.- प्रा. सचिन आगीवाल, आयुर्वेदिक महाविद्यालय

टॅग्स :Amravatiअमरावती