शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

रानमाळावर 'फ्लेम ऑफ द फायर'चा रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:50 IST

वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.

- अमित कांडलकर

गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.'फ्लेम ऑफ द फायर' असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले आहे. तो सध्या संपूर्ण रानमाळावर बहरला असून, होळीनिमित्त त्याच्यापासून तयार रंगाची उधळण केली जाते. शिषिर ऋतूमधील हवेतला गारवा जाऊन पानगळीने उघडे पडलेली वनसंपदा पळस फुलाच्या सौंदयाने रंगउधळण करतांना लक्ष वेधून घेते.संस्कृतीमध्ये पळस फुलांना पलाश म्हणतात. याचा अर्थच फुलांनी डवरलेले झाड, असा होतो. पळसाची फुले सरस्वती माता आणि कालिमातेला भक्तिभावाने अर्पण करण्याची पद्धती आहे. त्याच्या नावावरच 'कुठेही गेला तरी पळसाला पाने तीनच' अशी म्हण प्रचलित आहे. तोच पळस बहुगुणी असून, त्याच्या फुलांचा उपयोग होळीमध्ये रंग बनविण्यासाठी होतो. पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी केला जातो. पळस हा खडकाळ भागात अथवा शेताच्या धु-यावर वाकड्या स्थितीत आढळतो. त्याची उंची मध्यम असते. झाडाची संपूर्ण पाने गळून गेल्यानंतर पळसाच्या झाडाला फुलांचे घुमारे फुटतात. सद्यस्थितीत निसर्गामध्ये केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाची फुले आढळून येत आहेत. त्याची अनेक औषधी गुणधर्म असून, त्याच्यापासून तयार केलेल्या पाण्यात आंघोळ केल्यास अनेक त्वचारोग नाहीसे होतात. तसेच त्याच्या बियांचा आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग होतो, असे आयुर्वेदात नमूद आहे.

पळस पानांचा पुन्हा भाग्योदय निश्चित..! पळसाच्या पानाचा आकार मोठा असल्याने त्यापासून उत्तम पत्रावळी तयार करता येते. त्यावर केलेले अन्नग्रहण शरीरास उपयुक्त ठरते. तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे या पळसाच्या पानापासून पत्रावळी बनविणारा मोठा कारागीर वर्ग आहे. याचा वापर वाढवावा, जणेकरून थर्मोकोल, प्लास्टिक कोटींगच्या जीवघेण्या पत्रावळी बाद होतील. थर्मोकोल,  प्लास्टिक कोटींगच्या पत्रावळीमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ शकतो, असे इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात नमूद आहे. थर्मोकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यास त्यातील 'स्टायरीन' नामक विष अन्नात मिक्स होऊन अपाय होण्याची शक्यता असते.

थर्माेकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यामुळे पालीस्टायरीन निर्माण होते. ते अन्न पचविण्यास जड जाते. त्यामुळे किडनीचे आजार होतात.- प्रा. सचिन आगीवाल, आयुर्वेदिक महाविद्यालय

टॅग्स :Amravatiअमरावती