शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्टार्ट-अप’चे धडे, धोरण निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 17:26 IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय भावना विकसित करण्यासाठी त्यांना ‘स्टार्ट-अप’चे धडे दिले जाणार आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न असून, राज्यात ‘स्टार्ट-अप पॉलिसी’ ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. 

अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय भावना विकसित करण्यासाठी त्यांना ‘स्टार्ट-अप’चे धडे दिले जाणार आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न असून, राज्यात ‘स्टार्ट-अप पॉलिसी’ ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने सार्वजनिक विद्यापीठातून नवोपक्रम व नवसंशोधनाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने स्टार्टअप धोरण निश्चित केले जाईल. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू विलास गायकर यांच्या अध्यक्षतेखालील ही १४ सदस्यीय समिती सहा महिन्यांत धोरणाचा मसुदा तयार करेल. विविध विद्याशाखांसह सार्वजनिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यासह विद्यापीठातील स्टार्टअपमध्ये उद्योगांच्या समावेशाकरिता ‘फ्रेम वर्क’ निश्चित करून देण्याची जबाबदारी या समितीवर असेल. 

अन्य लाभार्थींच्या समावेशाच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वांसह उद्योजकता अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने उच्च तंत्रशिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी सार्वजनिक विद्यापीठातून नवोपक्रम व नवसंशोधनाला चालना दिली जाईल. त्या उपक्रमांची अंमलबजावणी नेमकी कशी करावी, याचा ऊहापोह शासनगठित समिती करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचा सहभाग असावा तसेच देशात नवीन उद्योग वाढविण्यासाठी युवकाभिमुख ‘स्टार्टअप पॉलिसी’ निश्चित केली आहे. राज्यात १ मार्च २०१७ पासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्टार्टअप धोरणाचा अंगीकार करण्यात येत आहे.

असा आहे कायदामहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम  २० नुसार संचालक - नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य या पदाची निर्मिती, कलम २६ (१४) नुसार नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम मंडळाची निर्मिती करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने स्टार्टअप धोरण ठरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना स्टार्टअपचे धडे देताना त्यांच्या नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन व मदत देऊन नवीन उद्योग स्थापन करणे हासुद्धा त्या तरतुदींचा उद्देश आहे.