शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाच वर्षांमध्ये ८० ग्रामपंचायतींत सव्वा तीनशे कोटींची सामूहिक लूट, ‘कॅग’चे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:31 IST

सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांचा कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींची सामूहिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 - गणेश वासनिक अमरावती - सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांचा कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींची सामूहिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मंत्रालय ते ग्रामपंचायत स्तरावर ही लूट झाली आहे. यातील दोषी अद्यापही कारवाईपासून दूर आहेत.            राज्यात दलितवस्ती सुधार योजनेत झालेल्या विकासकामांचे नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने औरंगाबाद, अकोला, बीड, चंद्रपूर, लातूर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे आठ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मार्च २०१५ मध्ये लेखापरीक्षा निरीक्षण केले. यात ८० ग्रामपंचायतींच्या १७७ पैकी १३६ वस्त्यांमध्ये २०२ कामे मंजूर होती. मात्र, यापैकी ७४ ग्रामपंचायतींमध्ये बृहत् आराखड्यात (डीपीआर) सन २०१३-२०१८ या पाच वर्षात प्रत्यक्ष लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसार, तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या २०११ च्या जनगणनेपेक्षा जास्त दर्शविली होती. ८० ग्रामपंचायतींचे डीपीआर तयार होते; मात्र त्यांचे स्वरूप समान नव्हते. ८०  पैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये निष्पादित केलेली ३४ कामे ही डीपीआरमध्ये समाविष्ट नव्हती. राज्यात २८ हजार ६ ग्रामपंचायती आहेत. १९७४ पासून दलितवस्ती सुधार योजना सुरू होऊन ग्रामपंचायतींना निधी हस्तांतरित केला जातो. ४१ वर्षांनंतर मुंबई महालेखाकार यांनी या योजनेच्या लेखांचे नमुनादाखल तपासणी केली असताना, ८० ग्रामपंचायती, आठ जिल्हा परिषद व १६ पंचायत समित्यांनी दलितवस्ती निधीचा विविध स्वरूपात बट्ट्याबोळ केल्याचे निदर्शनास आले. यात लोकसंख्या वाढवून दाखविणे, बृहत् आराखड्यात समाविष्ट कामाव्यतिरिक्त कामे करणे, दलित वस्त्यांशिवाय इतरत्र कामे करणे, विकासकामे मुदतीत न करणे, लेखे नियमानुसार न ठेवणे, मंत्रालय ते ग्रामपंचायत स्तरावर शासनादेश डावलून योग्य ते सनियंत्रण न करणे, समाजकल्याण अधिकाºयांनी एकाही कामाला भेटी न देणे, जि.प. कार्यकारी अभियंता लेखा संहिता १९६८ चे नियम १६६ नुसार कामाला भेटी न देणे, ग्रामपंचायतींनी कामाच्या ठिकाणी फलक न लावणे अशाप्रकारे गंभीर स्वरूपाच्या वित्तीय अनियमितता महालेखाकार कार्यालयाने शासनास कळविल्या आहेत. ८० ग्रामपंचायतींमधील नमुनादाखल तपासणीत कोट्यवधीचा घोटाळा २०१० ते २०१५ या पाच वर्षांमध्ये उघडकीस येत असेल, तर राज्यातील २८ हजार ६ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत किती कोटींचा घोटाळा झाला, याची चौकशी शासनाने करावी, घोटाळ्याला अभय देणाºया संवैधानिक लेखा कार्यालयाने जिल्हा स्तरावर जबाबदारी निश्चित करावी, असे कॅगने म्हटले आहे.  समाजकल्याण अधिका-यांकडून कामांची पडताळणी नाहीदलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सर्वच ८० ग्रामपंचायतींमध्ये झालेली विकासकामे जिल्हा समाजकल्याण अधिकाºयाने तपासली नाहीत. १३४ रस्ते, ८ समाजमंदिर, १३ सार्वजनिक प्रसाधनगृहे, ११ मलनि:सारण कामे, विद्युतीकरणाची ९ कामे व अन्य २७ कामांच्या तपासणीचे दस्तऐवज ‘कॅग’ ला मिळाले नाही, हे विशेष.   ४.७६ लाखांचे निष्क्रिय सौर दिवे  सन २०१३-२०१५ या दरम्यान ८० पैकी १७ ग्रामपंचायतींमध्ये १७० सौरऊर्जा पथदिवे लावण्यात आले. त्यापैकी ४.७६ लाख रुपये किमतीचे सौर दिवे निष्क्रिय असल्याचे ‘कॅग’ने तपासणीत स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती