शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मुख्यमंत्री साहेब, मरताना कोण बघतो महाराष्ट्र की मध्य प्रदेश?; निराधार पत्नीसह मुलीचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:41 IST

केंद्राने मदत करण्याची मागणी

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : मुख्यमंत्री साहेब, एक वेळच्या भाजीसाठी पती तलावात गेले होते. मासे-खेकडे मिळतील ते आणून आम्ही जेवणार होतो. त्यांना कुठे माहीत, मरावे कुठे? महाराष्ट्र की मध्य प्रदेशात? माझं कुंकू गेलं. आम्ही निराधार झालो. तुमचा कायदा आमच्याआड आला आहे. तुम्ही मदत देत नसाल, तर केंद्राने द्यावी, या आशयाचे पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह राज्य शासनाला ग्रामपंचायत सदस्य जया सलामे यांच्या माध्यमातून मरसकोल्हे कुटुंबीयांनी पाठविले आहे.

मेळघाटातील काजलडोह गावानजीक मध्य प्रदेशात कवड्या गावातील तलावातून रविवारी भाजीला काही नाही म्हणून रोजंदारीवर पोट भरणारे शंकर मरसकोल्हे (३२), मुलगा सागर (१२) व पुतण्या कार्तिक बिरू मरसकोल्हे (१३) हे खेकडे-मासे पकडायला गेले होते. तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली. कर्ता गेल्याने कुटुंब सैरभैर झाले असताना तलाव मध्य प्रदेशात असल्याने सरकारी मदतीपासून वंचित झालेली शंकरची पत्नी व मुलगा गमावलेला भासरा बिरू राज्य शासनाकडून मदतीची वाट बघत आहे. मदतीची मागणी सरपंच राजेश कवडे, सदस्य जया सलामे यांच्यासह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे.

सागर, आयुष जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी

दुर्दैवी घटनेतील मरसकोल्हे कुटुंबात सागर व कार्तिक हे काजलडोह येथील शाळेत इयत्ता चौथी व पाचव्या वर्गातील विद्यार्थी राजीव गांधी अपघात विमाअंतर्गत एक लाख रुपये दिले जाते. मात्र, सुटीचा कालावधी असल्याने या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शासन कुठला निर्णय घेते, हे अनुत्तरित आहे.

माझा पती, मुलगा गेला. आता जगावं कसं? आकाशाला ठिगळं भरपूर, लावायचे किती? आम्ही भारताचे रहिवासी एवढेच आम्हाला माहिती आहे. मदतीची मागणी केली आहे, शासनाने ती द्यावी.

- सुमन शंकर मरसकोल्हे, काजलडोह, चिखलदरा

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती