शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद?

By admin | Updated: April 13, 2017 00:12 IST

तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाचे पत्र : शेतकऱ्यांना मिळणार केवळ दोन दिवस परतवाडा : तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी बाजार समित्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. नाफेडच्या माध्यमातून राज्यात ४ जानेवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र विक्रमी उत्पादन झाल्यामुळे व बाजार समित्यांमधील मर्यादांमुळे तुरीची खरेदी मंदावली होती. यामुळे शेतकरी निराश झाला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांत मोजणी अभावी शिल्लक होती. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरी देखील तूर साठवून आहे.तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना काही दिवसांपूर्वी मिळाले होते. यामुळे बाजार समितीने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. परिणामी शेतकरी संतापले होते. दरम्यान तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र आता पूर्णत: तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाजार समित्यांनी १५ तारखेपासून तूर खरेदी करू नये, असे आदेश दिले आहेत. यांसदर्भातील पत्र बुधवारी सायंकाळी बाजार समित्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात येते. नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात आहे. मोजलेल्या तुरीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे बॅकांमधून धनादेशाची रक्कम लवकर खात्यात जमा होत नसल्याने देखील शेतकरी त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)१५ एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार संबधित केंद्राला तसे पत्र पाठविले आहे. मात्र विहित मुदतीमध्ये आलेल्या मालाची मोजणी केली जाईल.- अशोक देशमुख व्यवस्थापक, व्हीसीएमएफशासनाने तुरीचा शेवटाचा दाणा खरेदी करण्यापर्यंत खरेदी करण्याचे जाहीर केले होते. हजारो क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरात आहे. परिणामी खरेदीची मुदत न वाढविल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.- कुलदीप काळपांडे, उपसभापती, कृ.उ. बाजार समिती अचलपूर