शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद?

By admin | Updated: April 13, 2017 00:12 IST

तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाचे पत्र : शेतकऱ्यांना मिळणार केवळ दोन दिवस परतवाडा : तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी बाजार समित्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. नाफेडच्या माध्यमातून राज्यात ४ जानेवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र विक्रमी उत्पादन झाल्यामुळे व बाजार समित्यांमधील मर्यादांमुळे तुरीची खरेदी मंदावली होती. यामुळे शेतकरी निराश झाला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांत मोजणी अभावी शिल्लक होती. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरी देखील तूर साठवून आहे.तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना काही दिवसांपूर्वी मिळाले होते. यामुळे बाजार समितीने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. परिणामी शेतकरी संतापले होते. दरम्यान तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र आता पूर्णत: तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाजार समित्यांनी १५ तारखेपासून तूर खरेदी करू नये, असे आदेश दिले आहेत. यांसदर्भातील पत्र बुधवारी सायंकाळी बाजार समित्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात येते. नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात आहे. मोजलेल्या तुरीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे बॅकांमधून धनादेशाची रक्कम लवकर खात्यात जमा होत नसल्याने देखील शेतकरी त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)१५ एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार संबधित केंद्राला तसे पत्र पाठविले आहे. मात्र विहित मुदतीमध्ये आलेल्या मालाची मोजणी केली जाईल.- अशोक देशमुख व्यवस्थापक, व्हीसीएमएफशासनाने तुरीचा शेवटाचा दाणा खरेदी करण्यापर्यंत खरेदी करण्याचे जाहीर केले होते. हजारो क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरात आहे. परिणामी खरेदीची मुदत न वाढविल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.- कुलदीप काळपांडे, उपसभापती, कृ.उ. बाजार समिती अचलपूर