शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियान प्रारंभ

By admin | Updated: September 29, 2014 00:33 IST

भारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान

गजानन मोहोड - अमरावतीभारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे सूचित करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेंतर्गत सर्व शाळांमधून स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग आवश्यक असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्लीच्या अतिरिक्त सचिव वृंदा स्वरुप यांनी कळविले आहे. हा उपक्रम किंवा यापेक्षा वेगळे स्वच्छता व आरोग्यविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना आहे. राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याविषयी शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका तसेच विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची कायम जबाबदारी शासनाने घेतली आहे. शिक्षणामधून चांगल्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण मिळाले तर त्यांची शाळेबाबतची गोडी अधिक प्रमाणात वाढतील. परिणामत: विद्यार्थिनींची उपस्थिती वाढेल, शालेय उपक्रमातील सहभाग व एकंदरीतच दर्जेदार शिक्षण यामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदतच होईल, याच भूमिकेतून पंचप्रधानांचा विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादानंतर हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. याचा परिणाम चांगले होण्याची अपेक्षा आहे.