शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चांदूर बाजारात नागरिकांना सुरक्षित अंतरांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST

चांदूर बाजार : शासनाने आखून दिलेल्या संचारबंदीच्या नियमावलीनुसार दैनंदिन खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. अशात कोरोनाचा ...

चांदूर बाजार : शासनाने आखून दिलेल्या संचारबंदीच्या नियमावलीनुसार दैनंदिन खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अडचणीचे होत आहे, तर सुरू असलेल्या संचारबंदीतही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनी शासनाचा नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे.

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनातर्फे मोठ्या स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. याकरिता प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र, नागरिकांच्या आडमुठेपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबेना असा झाला आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटाझजर आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री उपाययोजना महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी या त्रिसूत्रीप्रमाणेच वागावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे. परंतु निडर बनलेल्या नागरिकांना याचे काही सोयरसुतक नाही.

दररोज सकाळी ७ ते ११ दरम्यान स्थानिक बाजारपेठांमध्ये उसळलेल्या गर्दीवरून खरेच कोरोनाचा उद्रेक थांबेल का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात कहर केला आहे. जिल्ह्यातही या लाटेने पाय पसरले असून, आधी शहरापुरती मर्यादित असलेली ही लाट गावखेड्यात पोहोचली आहे. दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यातही आता ग्रामीण भागातील बाधित रुग्णांचा आकडा भर देत आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना ठरावीक वेळ दिली आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून प्रशासनाचा नियमावलीचे पालन करून भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणे गरजेचे झाले आहे. मात्र, शहरात एकाच जागी भाजी मंडई व बाजार असल्याने मोठी गर्दी गोळा होताना दिसत आहे. या ठिकाणी दुकानदारांतर्फे कोणतीही सुरक्षा, सुविधा न बाळगता भाजीपाला विक्री होत असल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. त्यात अनेक नागरिक नियमांना पायदळी तुडवून बेभान वावरत आहेत. तथापि, यामुळे खरोखरच कोरोनाला आपण रोखू शकणार का, हा प्रश्न काही सुज्ञ नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विनामास्क दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे केली जात आहे.

---------------------

तेव्हाच होणार व्यापार मुक्त

जोवर कोरोनाचा रुग्ण संख्येत कमतरता येत नाही, तोपर्यंत शासनसुद्धा संचारबंदी उठविणार नाही. हे कठोर सत्य असून, नागरिकांनी साथ दिल्यास लवकरच रुग्णसंख्येचा आकडा आटोक्यात येईल आणि तेव्हाच व्यापारीची संचारबंदीतून मुक्तता होईल.