शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

कोरोनाकाळात नोंदणी विवाह माघारले, जानेवारीपासून वाढले रजिस्ट्रेशन अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. काेविड-१९ चा फटका सर्वच क्षेत्राला ...

कोरोनाकाळात नोंदणी विवाह माघारले, जानेवारीपासून वाढले रजिस्ट्रेशन

अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. काेविड-१९ चा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. विशेषत: राज्य शासनाने विविध विभागात कोरोनामुळे पदभरतीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे शिक्षित असूनही नोकरी, रोजगार नाही, अशी स्थिती तरुणाईची आहे. परिणामी वय झाले असतानाही लग्न करू शकत नाही आणि नोंदणी विवाहाचा तर प्रश्नच नाही, असे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाकाळात विवाहासाठी नोंदणी माघारल्याचे चित्र आहे.

कोरोनापूर्वी रजिस्टर्ड मॅरेज करण्यासाठी युवक-युवतींची पसंती होती. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीद्वारे मुला-मुलींच्या दोन्ही कुटुंबीयांच्या साक्षीने सरकारी कार्यालयात विवाह सोहळे पार पडले. मात्र, गत दीड वर्षापासून नोंदणी विवाहाला काहीसा ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे रोजगार नाही, नोकरी नाही केव्हा लग्न करणार, कसा संसार थाटणार, असे एक ना अनेक प्रश्न, समस्या तरुणाईपुढे भेडसावत आहे.

----------------------

आता रजिस्टर नोंदणीत वाढ

कोरोनाकाळात नक्कीच रजिस्टर नोंदणी माघारली होती. मात्र, यंदा जानेवारीपासून कमी, अधिक प्रमाणात विवाहोत्सुक युवक-युवतींची ऑनलाईन नोंदणी वाढत आहे. दरदिवशी चार ते पाच विवाह होत आहेत.

-पी.व्ही. खंडेराय, विवाह नोंदणी अधिकारी, अमरावती.

--------------

कधी किती झाले नोंदणी विवाह?

२०१८-------------- ९३३

२०१९---------------------९७३

२०२०-----------------८३१

२०२१ जानेवारी--------- १५९

२०२१ फेब्रुवारी-------------६२

२०२१ मार्च-------------- ११३

२०२१ एप्रिल------ ८७

२०२१ मे------------३६

२०२१ जून------------ ६५

२०२१ जुलै------------- ४७

-------------

यंदा सात महिन्यात कमी-अधिक प्रमाणात नोंदणी

१) यंदा जानेवारीपासून रजिस्टर नोंदणीला कमी-अधिक प्रमाणात ऑनलाईन नोंदणी होत आहे. दरदिवशी चार ते पाच जाेडणी विवाह बंधनात अडकत आहेत.

२) कोरोनामुळे संचारबंदी लागू असून, सार्वत्रिक विवाह सोहळ्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे रजिस्टर्ड मॅरेज नोंदणी वाढत आहे. गरीब, सामान्य कुटुंबातसुद्धा रजिस्टर्ड मॅरेजला पसंती आहे.

-----------

कोरोना कधी जाईल, याची प्रतीक्षा आहे. गत दीड वर्षापासून रोजगाराचा पत्ता नाही. वय निघून जात आहे. काय करावे, सुचत नाही. आता तरी कोरोना जाईल आणि नोकरी, कामधंदा शोधून लग्न होईल, अशी अपेक्षा आहे.

- अभिजित कावळे.

--------

अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे स्वप्न आहे. मात्र, कोरोनामुळे शासकीय, खासगीतही नोकरभरती नाही. असे किती दिवस प्रतीक्षा करावी, हे समजत नाही.

- रंजना मोरे.