शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

शाळा सोडून चिमुकले आंदोलनात, रात्रीही जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने ४ मार्चपासून प्राणांतिक महाउपोषण आरंभले आहे. विदर्भातून सर्वदूरचे प्रकल्पग्रस्त महिलांसह त्यात सहभागी झाले असताना, गुरुवारी या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनीही शाळा सोडून आंदोलनात उडी घेतली. अमरावती विभागातील ५०पेक्षा अधिक मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, उपोषणाच्या सातव्या दिवशीही प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. सुमारे ५०० जण या महाउपोषणात सहभागी झाले आहेत. दिवस-रात्र त्यांचा कंठशोष सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील रंजना कुचे व सुलभा ढोंडे यांना गुरुवारी पहाटे  इर्विनमध्ये हलविण्यात आले. शासन-प्रशासन शाश्वत उपाययोजना करायला तयार दिसत नसल्याने  शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकरी उपोषणापासून मागे हटायला तयार नाहीत.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर शासन भानावर येणार का, असा प्रश्न उपस्थित शेतकरी विचारत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या धुडकावून शासन-प्रशासन आमच्या उपोषणमंडपी शेतकरी शहीद स्मारक उभारणीची तयारी करीत असल्याच्या संतप्त भावना उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती करीत आहे.

रात्रभरही उपोषण४ मार्चपासून अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील शेकडो प्रकल्पबाधित महाउपोषणात सहभागी होत आहेत. त्यात महिलांचा सहभाग दखलनीय आहे. आता त्यात त्यांची चिमुकलीही सहभागी झाल्याने उपोषण मंडपाला ‘प्रकल्पग्रस्तांचे कुटुंब’ अशी नवी उपाधी मिळाली आहे. उपोषण मंडपाशेजारी दररोज दोन्हीवेळचे भोजन शिजत असून, सलग सात रात्री उपोषणकर्त्यांनी जागून काढल्या आहेत.

अशा आहेत मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेेदीधारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला द्यावा. महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ते शक्य नसल्यास एकरकमी २० लाख रुपये देण्यात यावे. विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक समस्या तातडीने निकाली काढाव्यात.

 

टॅग्स :agitationआंदोलन