शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शाळा सोडून चिमुकले आंदोलनात, रात्रीही जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने ४ मार्चपासून प्राणांतिक महाउपोषण आरंभले आहे. विदर्भातून सर्वदूरचे प्रकल्पग्रस्त महिलांसह त्यात सहभागी झाले असताना, गुरुवारी या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनीही शाळा सोडून आंदोलनात उडी घेतली. अमरावती विभागातील ५०पेक्षा अधिक मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, उपोषणाच्या सातव्या दिवशीही प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. सुमारे ५०० जण या महाउपोषणात सहभागी झाले आहेत. दिवस-रात्र त्यांचा कंठशोष सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील रंजना कुचे व सुलभा ढोंडे यांना गुरुवारी पहाटे  इर्विनमध्ये हलविण्यात आले. शासन-प्रशासन शाश्वत उपाययोजना करायला तयार दिसत नसल्याने  शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकरी उपोषणापासून मागे हटायला तयार नाहीत.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर शासन भानावर येणार का, असा प्रश्न उपस्थित शेतकरी विचारत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या धुडकावून शासन-प्रशासन आमच्या उपोषणमंडपी शेतकरी शहीद स्मारक उभारणीची तयारी करीत असल्याच्या संतप्त भावना उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती करीत आहे.

रात्रभरही उपोषण४ मार्चपासून अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील शेकडो प्रकल्पबाधित महाउपोषणात सहभागी होत आहेत. त्यात महिलांचा सहभाग दखलनीय आहे. आता त्यात त्यांची चिमुकलीही सहभागी झाल्याने उपोषण मंडपाला ‘प्रकल्पग्रस्तांचे कुटुंब’ अशी नवी उपाधी मिळाली आहे. उपोषण मंडपाशेजारी दररोज दोन्हीवेळचे भोजन शिजत असून, सलग सात रात्री उपोषणकर्त्यांनी जागून काढल्या आहेत.

अशा आहेत मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेेदीधारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला द्यावा. महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ते शक्य नसल्यास एकरकमी २० लाख रुपये देण्यात यावे. विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक समस्या तातडीने निकाली काढाव्यात.

 

टॅग्स :agitationआंदोलन