शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

परीक्षा केंद्रांवर बालकांमगार

By admin | Updated: February 24, 2015 01:03 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्डाच्यावतीने सुरु

वैभव बाबरेकर

अमरावती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्डाच्यावतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची तहान भागविण्याचे काम बालकामगार करीत आहेत. जिल्ह्यातील १२२ केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांवर बालकामगारांनाच पाणी वाटपाचे काम करावे लागते. त्यामुळे बालकांना शिक्षणप्रवाहात आणणारे शिक्षण मंडळ व संस्थाच बालकामगारांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली असून जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर ३५ हजार ६२८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये २०,७६७ नियमित तर १८८८ बहि:शाल विद्यार्थी आहेत. परीक्षेकरिता जिल्ह्यात सहा दक्षता पथक तयार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक असून त्यामध्ये ३ पुरुष व १ महिला सदस्य आहे. परीक्षेच्या प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त व शिस्तप्रिय वातावरण दिसून येत आहे. त्यातच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर एक पर्यवेक्षक व सहायक पर्यवेक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सुविधा पुरविण्याचे कार्य करीत आहेत. मात्र, परीक्षा केंद्रांवर बालकामगारांकडून पाणीवाटपाचे काम करुन घेतले जात आहे. बालश्रमिकांचे शोषण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. मात्र ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या शिक्षण मंडळाशी संलग्न संस्थाच बालकामगारांचा वापर करीत असल्याचे दुर्देवी चित्र 'लोकमत'च्या सर्व्हेदरम्यान निदर्शनास आले आहे. शनिवारी बारावीचा मराठी विषयाचा पेपर घेण्यात आला. रविवारी सुटी व सोमवारी इंग्रजीचा पेपर होता. पर्यवेक्षकांची जबाबदारी४बारावी व दहावीच्या परीक्षेपूर्वी शालेय संर्स्थंनी नेमलेल्या पर्यवेक्षकांना सूचना पुस्तक देण्यात येते. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे संस्थांना आवश्यक असते. नव्हे ती त्यांची जबाबदारीच असते, असे विभागीय सचिव प्रदीपकुमार अभ्यंकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. शिक्षण मंडळाचे सूचना पुस्तक संस्थेने नेमलेल्या पर्यवेक्षकांना दिले जाते. त्या सूचनेची अमलंबजावणी करणे सक्तीचे आहे. मात्र, सूचनेचे पालन होत नसेल तर संबंधिताना पत्राद्वारे सूचना देऊ. - प्रदीपकुमार अभ्यंकर,विभागीय सचिव,अमरावती विभाग मंडळ.शालेय संस्थांनी बालकामगार ठेवू नये, असे आढळल्यास पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल. असे आढळल्यास कारवाई करु.- डी.बी. जाधव,सहाय्यक कामगार आयुक्त.पाणीवाटप करताना बालकामगार आढळल्यास समितीमार्फत संस्थाच्या प्राचार्यांना पत्र देण्यात येईल. सूचनाचे पालन होणे अनिवार्य आहे. - अजय देशमुख,सदस्य, चाईल्ड लाईन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. बालकामगार आढळल्यास संपर्क करा४शासन बालकामगार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शहरात कुठेही बालकामगार आढळल्यास टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईनचे सदस्य अजय देशमुख यांनी केले.