शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा ‘क्लास’; तब्बल चार तास ‘व्हीसी’

By गणेश वासनिक | Updated: March 1, 2025 18:36 IST

देवाभाऊंची कमाल : सात हजार अधिकाऱ्यांची हजेरी; १० विभागांनी मारली दांडी

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी तालुका स्तरावरील एकाचवेळी सलग चार तास ‘व्हीसी’वर ‘क्लास’ घेतल्याने तब्बल सात हजार अधिकारी थकून गेले होते. मात्र, देवाभाऊंनी न थकता १०० दिवसांचा आढावा घेऊन शासकीय अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरवली. त्यामुळे आता ‘एआय’सारखे तंत्रज्ञान अधिकाऱ्यांंना हाताळावे लागणार आहे.

शासन लोकाभिमुख करणे आणि सुस्तावलेल्या प्रशासनाला अगोदर जागे करण्याची गरज असल्याची बाब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. पारदर्शक प्रशासनाची हमी देत शासकीय कार्यालयांना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला. लोकांचे प्रशासकीय जीवनमान सुकर करण्यासाठी राज्यातील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारीसुद्धा कामाला लागले आहेत. एक महिन्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामाचा आढावा गुरूवार, २७ फेब्रुवारी रोजी घेतला, हे विशेष. 

चार तास ‘व्हीसी’वर मुख्यमंत्री१०० दिवसांमध्ये राज्यातील ५० विभाग आणि १३ महामंडळांनी किती ‘दिवे’ लावलेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारीमंत्रालयापासून तर तालुकास्तरावर अधिकाऱ्यांना ‘क्लास’ घेतला. मुख्यमंत्री सलग चार तास ‘व्हीसी’वर बसून होते. मात्र काहीतासातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीद्वय बाहेर पडले. सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाआणि पारदर्शक प्रशासनाची हमी भरली.

सात हजार अधिकारी ‘व्हीसी’मध्ये हजरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयात राज्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‘व्हीसी’वर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्यांदाच प्रधान सचिवांपासून तर थेट तालुकास्तरीय अधिकाऱ्यांंचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात १०० दिवसांमध्ये ई-ऑफिस, एआयचा वापर, सायबर गुन्हे, सुकर जीवनमान, अत्यावश्यक सेवा, स्वच्छता, नीटनिटके कार्यालय, वृक्षारोपण आदी विषयांचा आढावा स्वत: मुख्यमंत्र्यांनी घेतला.

१५ विभागांकडून पीपीटी सादर१०० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने कुठल्या विभागाने कशी कामगिरी बजावली याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशन(पीपीटी) द्वारे घेतला. यावेळी १५ विभागाने पीपीटी सादर केले. यात मृद व जलसंधारण, आदिवासी विकास विभाग, बृहन्मुंबई पोलिस, पालघर, सातारा पोलिस, छत्रपती संभाजीनगर पोलिस महानिरीक्षक, चंद्रपूर, ठाणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, अमरावती, जळगाव व नागपूर जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, मुख्य कार्यपालन अधिकारी धुळे, प्रधान सचिव गृह आदी अधिकाऱ्यांनी १०० दिवसांमध्ये केलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली. पोलिस विभागाने ‘एआय’च्या वापरासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये परिवहन, वनविभाग, कृषी, लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य, पर्यटन आणि शिक्षण विभाग कुठेही ‘पीपीटी’त दिसले नाहीत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावती