शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

'लाडका शेतकरी दादा' योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राबवावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:03 IST

Amravati : शेतमालाला भाव, विम्याचे सरसकट कवच, मोसंबी संत्रा फळांना राजाश्रयाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा बाजार : सध्या राज्यात 'माझी लाडकी बहीण'पाठोपाठ भावाची योजना सुरू झाली आहे. अशा लाडक्यांकडून योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आश्वस्त करण्यासाठी शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेत लाभार्थ्यांना महिन्याला दीड हजार मिळणार आहे. मात्र, जगाचा - पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी जर शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना आणून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार हमीभाव मिळावा, ही रास्त अपेक्षा या योजनेंतर्गत हवी, अशी मागणी आहे. 

शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर आहे. हा अशाश्वत व्यवसाय शेतकऱ्यांचे जीवन डावावर लावतो. अनेक शेतकरी नापिकीमुळे कर्ज भरण्यास असमर्थ राहतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. 'विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा मोसंबी फळबागांची अवस्था केविलवाणी आहे. येथल्या संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा, ही मागणी आहे. 'माझा लाडका शेतकरी दादा' या योजनेत फळपिकांना विम्याचे कवच, योग्य भाव तसेच फळांवर आधारित वायनरी प्रकल्प येथे उभे केले की, संत्रा मोसंबी फळांच्या सर्व प्रतवारीच्या फळांना योग्य भाव मिळेल, हीच रास्त अपेक्षा व मागणी असल्याचे असंख्य संत्रा मोसंबी उत्पादकांनी 'लोकमत'शी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

"गतवर्षी अतिवृष्टी व नंतर गारपिटीने फळबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळाली नाही. शासनाने आता माझा लाडका शेतकरी दादा ही योजना आणली पाहिजे. शासनाने शेतकऱ्यांकडे सकारात्मक बघायला हवे. तरच हा जगाचा पोशिंदा जगेल."- गिरीश कराळे, संत्रा उत्पादक, वरुड

"शासनाने माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ ही योजना आणली आहे. आता शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी दादा ही योजना शासनाने राबवावी. फळबागांना विमा कवच, खासगी व्यापाऱ्यांवर अंकुश, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने ही योजना राबवावी."- धनंजय विंचूरकर, संत्रा-मोसंबी उत्पादक

"संत्रा उत्पादक शेतकरी जगला पाहिजे असेल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी."- राजेंद्र ताथोडे, संत्रा उत्पादक, शेतकरी बेलोरा (ताथोडे] 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी