शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

'लाडका शेतकरी दादा' योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राबवावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:03 IST

Amravati : शेतमालाला भाव, विम्याचे सरसकट कवच, मोसंबी संत्रा फळांना राजाश्रयाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा बाजार : सध्या राज्यात 'माझी लाडकी बहीण'पाठोपाठ भावाची योजना सुरू झाली आहे. अशा लाडक्यांकडून योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आश्वस्त करण्यासाठी शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेत लाभार्थ्यांना महिन्याला दीड हजार मिळणार आहे. मात्र, जगाचा - पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी जर शासनाने 'माझा लाडका शेतकरी दादा' ही योजना आणून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार हमीभाव मिळावा, ही रास्त अपेक्षा या योजनेंतर्गत हवी, अशी मागणी आहे. 

शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर आहे. हा अशाश्वत व्यवसाय शेतकऱ्यांचे जीवन डावावर लावतो. अनेक शेतकरी नापिकीमुळे कर्ज भरण्यास असमर्थ राहतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. 'विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा मोसंबी फळबागांची अवस्था केविलवाणी आहे. येथल्या संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा, ही मागणी आहे. 'माझा लाडका शेतकरी दादा' या योजनेत फळपिकांना विम्याचे कवच, योग्य भाव तसेच फळांवर आधारित वायनरी प्रकल्प येथे उभे केले की, संत्रा मोसंबी फळांच्या सर्व प्रतवारीच्या फळांना योग्य भाव मिळेल, हीच रास्त अपेक्षा व मागणी असल्याचे असंख्य संत्रा मोसंबी उत्पादकांनी 'लोकमत'शी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

"गतवर्षी अतिवृष्टी व नंतर गारपिटीने फळबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळाली नाही. शासनाने आता माझा लाडका शेतकरी दादा ही योजना आणली पाहिजे. शासनाने शेतकऱ्यांकडे सकारात्मक बघायला हवे. तरच हा जगाचा पोशिंदा जगेल."- गिरीश कराळे, संत्रा उत्पादक, वरुड

"शासनाने माझी लाडकी बहीण व लाडका भाऊ ही योजना आणली आहे. आता शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी दादा ही योजना शासनाने राबवावी. फळबागांना विमा कवच, खासगी व्यापाऱ्यांवर अंकुश, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने ही योजना राबवावी."- धनंजय विंचूरकर, संत्रा-मोसंबी उत्पादक

"संत्रा उत्पादक शेतकरी जगला पाहिजे असेल, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी."- राजेंद्र ताथोडे, संत्रा उत्पादक, शेतकरी बेलोरा (ताथोडे] 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी