शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मानसिकता बदला, अमरावती बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:08 IST

'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देकायदा, सुव्यवस्थेसाठी बांधीलपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पोलीस आयुक्तांनी गुरुवारी गणेश आगमनाच्या सुरक्षेविषयी आढावा घेतला. त्यावेळी कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून शिस्तप्रियतेसोबत समाजाप्रति बांधीलकी दिसून आली. अंबानगरीतील हाताबाहेर गेलेली वाहतूक समस्या कशी सुटेल, यासंबधाने त्यांनी विस्तृत चर्चा केली. पूर्वीच्या व आताच्या शहरात व्यापक बदल झाला आहे. लोकसंख्येसोबत वाहनांची प्रचंड संख्या वाढली. विकासकामे प्रगतिपथावर आहेत, आगामी काळाच्या दृष्टीने सिमेंट रोडची कामे सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडत असताना काही अडचणींचा सामना करावाच लागणार आहे. त्यातून सकारात्मक मार्ग कसा काढता येईल, यादृष्टीने सांघिक प्रयत्न करायला हवेत. त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती नागरिकांची मानसिकता. रस्त्याने वाहन चालवताना प्रत्येकाने समाजभान ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वत: शिक्षक बनून दुसºयाची मानसिकता बदलायला हवी. बदल स्वत:पासूनच सुरू करावा. प्रथम स्वत:ची मानसिकता बदला, नियमात चालण्याची स्वत:ला सवय लावा, त्यानंतरच शहर बदलायला निघा. मग बघा, शहराचा चेहरामोहरा कसा पालटतो, अशी कळकळीची भावना सीपींनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रयत्न करताना चांगले नागरिक घडविण्याचे काम मी पूर्वीपासूनच करतोय. पुढेही ते सुरुच राहील. अमरावतीकरांनी आपल्या परीने हातभार लावावा. बदल एका रात्रीतून घडत नाही. क्रांतीला निश्चित कालावधी लागतो. मात्र, त्यापूर्वी क्रांतीची बीजी रोवायला हवीत, तर शहराचा कालापालट होण्यास वेळ लागणार नाही, असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला.पोलिसांना प्रोत्साहित करापोलीस दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटतात. दिवसभर उभे राहून कर्तव्य बजावतात. त्यांची काळजी घेतल्यास, त्यांना प्रोत्साहित केल्यास, ते उत्तम प्रकारे कर्तव्य बजावतील. गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णपणे बंद होणे शक्य नसले तरी आम्ही त्यावर अंकुश ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहोत.स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावाहन चालविताना हेल्मेट वापरायला हवे. नियम असतानाही बहुतांश नागरिक हेल्मेट वापरत नाहीत. मी भातकुली, वलगाव व नांदगाव ठाण्यात गेलो. तेथील पोलिसांना हेल्मेट वापरण्यास सांगितले आहे. कर्तव्य बजावताना आधी स्वत: सुरक्षित आहोत का, हे लक्षात घ्या. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांची सुरक्षा करू शकाल, असेही सीपींनी सांगितले.वाहतूक समस्या निराकरणासाठी प्रयत्नशहरातील वाहतुकीविषयी आरटीओ, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतूक निर्धोक व्हावी, याकडे विशेष देण्यात आले आहे. ते बदल काही दिवसांत दिसतीलच. वाहनचालकांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, त्यांना शिस्त लागणार नाही, तोपर्यंत नागरिकांना वाहतुकीचे धडे द्यावे लागतील, त्यांच्यात वाहतूक नियमांविषयी जनजागृती करावी लागेल, असे सीपी म्हणाले.