शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मानसिकता बदला, अमरावती बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:08 IST

'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देकायदा, सुव्यवस्थेसाठी बांधीलपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर्थाने समस्या दूर होऊन बदल घडतील, अशी भावना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पोलीस आयुक्तांनी गुरुवारी गणेश आगमनाच्या सुरक्षेविषयी आढावा घेतला. त्यावेळी कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून शिस्तप्रियतेसोबत समाजाप्रति बांधीलकी दिसून आली. अंबानगरीतील हाताबाहेर गेलेली वाहतूक समस्या कशी सुटेल, यासंबधाने त्यांनी विस्तृत चर्चा केली. पूर्वीच्या व आताच्या शहरात व्यापक बदल झाला आहे. लोकसंख्येसोबत वाहनांची प्रचंड संख्या वाढली. विकासकामे प्रगतिपथावर आहेत, आगामी काळाच्या दृष्टीने सिमेंट रोडची कामे सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडत असताना काही अडचणींचा सामना करावाच लागणार आहे. त्यातून सकारात्मक मार्ग कसा काढता येईल, यादृष्टीने सांघिक प्रयत्न करायला हवेत. त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती नागरिकांची मानसिकता. रस्त्याने वाहन चालवताना प्रत्येकाने समाजभान ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वत: शिक्षक बनून दुसºयाची मानसिकता बदलायला हवी. बदल स्वत:पासूनच सुरू करावा. प्रथम स्वत:ची मानसिकता बदला, नियमात चालण्याची स्वत:ला सवय लावा, त्यानंतरच शहर बदलायला निघा. मग बघा, शहराचा चेहरामोहरा कसा पालटतो, अशी कळकळीची भावना सीपींनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रयत्न करताना चांगले नागरिक घडविण्याचे काम मी पूर्वीपासूनच करतोय. पुढेही ते सुरुच राहील. अमरावतीकरांनी आपल्या परीने हातभार लावावा. बदल एका रात्रीतून घडत नाही. क्रांतीला निश्चित कालावधी लागतो. मात्र, त्यापूर्वी क्रांतीची बीजी रोवायला हवीत, तर शहराचा कालापालट होण्यास वेळ लागणार नाही, असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला.पोलिसांना प्रोत्साहित करापोलीस दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटतात. दिवसभर उभे राहून कर्तव्य बजावतात. त्यांची काळजी घेतल्यास, त्यांना प्रोत्साहित केल्यास, ते उत्तम प्रकारे कर्तव्य बजावतील. गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णपणे बंद होणे शक्य नसले तरी आम्ही त्यावर अंकुश ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहोत.स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावाहन चालविताना हेल्मेट वापरायला हवे. नियम असतानाही बहुतांश नागरिक हेल्मेट वापरत नाहीत. मी भातकुली, वलगाव व नांदगाव ठाण्यात गेलो. तेथील पोलिसांना हेल्मेट वापरण्यास सांगितले आहे. कर्तव्य बजावताना आधी स्वत: सुरक्षित आहोत का, हे लक्षात घ्या. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांची सुरक्षा करू शकाल, असेही सीपींनी सांगितले.वाहतूक समस्या निराकरणासाठी प्रयत्नशहरातील वाहतुकीविषयी आरटीओ, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतूक निर्धोक व्हावी, याकडे विशेष देण्यात आले आहे. ते बदल काही दिवसांत दिसतीलच. वाहनचालकांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, त्यांना शिस्त लागणार नाही, तोपर्यंत नागरिकांना वाहतुकीचे धडे द्यावे लागतील, त्यांच्यात वाहतूक नियमांविषयी जनजागृती करावी लागेल, असे सीपी म्हणाले.