शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकडे निघालेल्या चंदनाला फुटले पाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:01 IST

वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती.

ठळक मुद्देवनाधिकाऱ्यांनी नेले २४४ किलो : भरले २३५ किलो

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वनाविभागाने सोलापूरला पाठविलेल्या चंदनाला पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट वनपरिक्षेत्रातील २४४ किलो चंदन कार्टीन चलानसह फिरते पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत सोलापूर वनविभागाकडे पाठविण्यात आले होते. सोलापूरला ते चंदन संबंधित वनाधिकाऱ्यांनी मोजले तेव्हा २३५ किलो भरले. कमी भरलेल्या या चंदनाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती. ठिकठिकाणाहून वनविभागाने आपल्याकडील चंदन यवतमाळला पाठविले. यात यवतमाळचे गोडाऊन हाऊसफुल्ल झाले.दरम्यान, मेळघाटकडील चंदन सोलापूरला मागवण्यात आले. पश्चिम मेळघाट वनविभागाकडील आकोट येथून ११३ किलो चंदन फेब्रुवारी २०१९ मध्ये सोलापूरला पाठविले गेले. पूर्व मेळघाटमधील जारिदा व अन्य ठिकाणावरील चंदन वनविभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवले गेले. अंजनगाव येथील पोलिसांनी पकडलेले व पश्चिम मेळघाटचेही चंदन याच गोडाऊनमध्ये होते. अंजनगावचे चंदन पोलिसांनी पकडल्यामुुळे ते सोलापूरला न पाठवता अंजनगावला परत केले गेले. हे चंदन ठेवून घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी अंजनगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दुर्लक्षित अवस्थेत तसेच पडून आहे.चंदनाची चोरीवनविभागाच्या आवारातील परतवाडा गोडाऊनमधून २७ किलो चंदन चोरट्यांनी पळविले आहे. उत्तम दर्जाचे ग्रेड-१ मधील हे चंदन मार्च १९ मध्ये लंपास झाले. या चंदनासह चोरट्यांनी तांब्याच्या धातूचे सात भलेमोठे गुंड (डेग) चोरून नेले. इंग्रजांच्या काळातील हे भारी गुंड एका व्यक्तीला उचलतही नाहीत, तर चार ते पाच लोक लागतात. हे गुंड तिखाडीचे तेल काढण्याकरिता उपयोगात आणले जायचे. या चोरीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वनाधिकारी मोकळे झाले आहेत. तथापि, अजूनपर्यंत या चोरीचा तपास लागलेला नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग