शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:49 IST

यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे

गणेश वासनिक  अमरावती : यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे यंदा विदर्भातील वनवणवा रोखणे वनविभागासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.  दुसरीकडे वन्यप्राण्यांना तृष्णा भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राज्यात प्रादेशिक वनविभाग, व्याघ्र प्रकल्पात लाखोे हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर वन्यपशू, वनसंपदा अस्तित्वात आहे. मार्च, एप्रिलमध्ये दरवर्षी वणवा पेटून हजारो हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होतात. वन्यपशू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. गतवर्षी ७० हजार हेक्टर जंगलवनवणव्याने व्यापल्याची नोंद वनविभागात झाली आहे. वनविभागाचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी फेब्रुवारीत राज्यातील वनाधिका-यांना पत्र पाठवून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वनविभागाने वनवणव्यावर लगाम लावण्यासाठी काही उपयायोजनाही केल्या आहेत. ज्या वनखंडात तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत, त्या जंगलाला आग लागल्यास तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराचे परवाने रद्द करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोहफूल वेचणाºयांवर लक्ष, शिकाºयांवर पाळत, कुरण विकास आदी उपक्रम सुरू आहे. जंगलांना आग लागू नये, याची खबरदारी वनविभाग घेत असताना अचानक दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जंगलात वनवणवा हा मार्च ते मे या कालावधीत लागतो. याच महिन्यात जंगलात आग लागू नये, याची खबरदारी घेतली जाते. परंतु यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने ही बाब वन्यपशुंसाठी उन्हाळ्यात धोकादायक ठरणारी आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यपशुंना त्यांच्या सुरक्षित क्षेत्रातच पाणी, भक्ष्य मिळविणे कठीण झाले आहे. गतवर्षी विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सॅटेलाईट सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले होते. यावर्षी चंद्रपूर, यवतमाळ, ताडोबा, मेळघाटच्या सेमाडोह, अमरावती नजीकच्या वडाळी, पोहरा, चांदूर रेल्वे जंगलात आग लागण्याच्या घटना घटल्या आहे. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची वानवा, पाणीटंचाई आदी बाबी उपलब्ध होत नसल्याने आगीवर ंिनयंत्रण मिळविताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.     वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याच्या सूचना मार्च महिना सुरू झाला की, जंगलात गवत वाळू लागतात. यावर्षी विदर्भातील जंगलात हीच स्थिती आहे. वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जंगलात आग आणि शिकाºयांवर पाळत ठेवण्यासाठी वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याचा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. आगीवर सॅटेलाईटने लक्षजंगलात मनुष्यनिर्मित अथवा अचानक लागणाºया आगीवर वनविभाग सॅटेलाईटने लक्ष्य ठेवून आहे. डेहरादून येथील वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून राज्यात वनवणव्यावर सॅटेलाईटने लक्ष्य ठेवले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. मात्र, मे महिन्यात वनवणवा पेटू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

‘‘ मार्च, एप्रिलमध्ये जंगलांना आग लागण्याचा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे वनविभाग यावेळी सज्ज आहे. जाळरेषा तयार करण्यात आल्या असून एका वनबिटमध्ये एक मजूर नियुक्ती आहे. आग विझवणारे कर्मचारी नेमण्यात आले आहे. मे महिन्यात विशेष काळजी घेतली जाणार आहे.- हेमंत मीणा,उपवनसंरक्षक, अमरावती