शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विदर्भात वनवणवा रोखणे ‘चॅलेंजिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:49 IST

यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे

गणेश वासनिक  अमरावती : यंदा विदर्भातील जंगलात फेब्रुवारी, मार्चपासून आग लागण्याचा घटना घडत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आजही वनविभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे यंदा विदर्भातील वनवणवा रोखणे वनविभागासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.  दुसरीकडे वन्यप्राण्यांना तृष्णा भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राज्यात प्रादेशिक वनविभाग, व्याघ्र प्रकल्पात लाखोे हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर वन्यपशू, वनसंपदा अस्तित्वात आहे. मार्च, एप्रिलमध्ये दरवर्षी वणवा पेटून हजारो हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होतात. वन्यपशू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. गतवर्षी ७० हजार हेक्टर जंगलवनवणव्याने व्यापल्याची नोंद वनविभागात झाली आहे. वनविभागाचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी फेब्रुवारीत राज्यातील वनाधिका-यांना पत्र पाठवून वणवा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वनविभागाने वनवणव्यावर लगाम लावण्यासाठी काही उपयायोजनाही केल्या आहेत. ज्या वनखंडात तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत, त्या जंगलाला आग लागल्यास तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराचे परवाने रद्द करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोहफूल वेचणाºयांवर लक्ष, शिकाºयांवर पाळत, कुरण विकास आदी उपक्रम सुरू आहे. जंगलांना आग लागू नये, याची खबरदारी वनविभाग घेत असताना अचानक दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसाने वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जंगलात वनवणवा हा मार्च ते मे या कालावधीत लागतो. याच महिन्यात जंगलात आग लागू नये, याची खबरदारी घेतली जाते. परंतु यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने ही बाब वन्यपशुंसाठी उन्हाळ्यात धोकादायक ठरणारी आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यपशुंना त्यांच्या सुरक्षित क्षेत्रातच पाणी, भक्ष्य मिळविणे कठीण झाले आहे. गतवर्षी विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सॅटेलाईट सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले होते. यावर्षी चंद्रपूर, यवतमाळ, ताडोबा, मेळघाटच्या सेमाडोह, अमरावती नजीकच्या वडाळी, पोहरा, चांदूर रेल्वे जंगलात आग लागण्याच्या घटना घटल्या आहे. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची वानवा, पाणीटंचाई आदी बाबी उपलब्ध होत नसल्याने आगीवर ंिनयंत्रण मिळविताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.     वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याच्या सूचना मार्च महिना सुरू झाला की, जंगलात गवत वाळू लागतात. यावर्षी विदर्भातील जंगलात हीच स्थिती आहे. वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जंगलात आग आणि शिकाºयांवर पाळत ठेवण्यासाठी वनकर्मचाºयांना अलर्ट राहण्याचा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. आगीवर सॅटेलाईटने लक्षजंगलात मनुष्यनिर्मित अथवा अचानक लागणाºया आगीवर वनविभाग सॅटेलाईटने लक्ष्य ठेवून आहे. डेहरादून येथील वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून राज्यात वनवणव्यावर सॅटेलाईटने लक्ष्य ठेवले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. मात्र, मे महिन्यात वनवणवा पेटू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

‘‘ मार्च, एप्रिलमध्ये जंगलांना आग लागण्याचा दरवर्षीचाच अनुभव आहे. त्यामुळे वनविभाग यावेळी सज्ज आहे. जाळरेषा तयार करण्यात आल्या असून एका वनबिटमध्ये एक मजूर नियुक्ती आहे. आग विझवणारे कर्मचारी नेमण्यात आले आहे. मे महिन्यात विशेष काळजी घेतली जाणार आहे.- हेमंत मीणा,उपवनसंरक्षक, अमरावती