शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

विदर्भात जंगलातील वनवणवा रोखण्याचे ‘चॅलेंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

मार्चमध्ये तापमान वाढले, तोकड्या सुविधा, मनुष्यबळाचा अभाव, ‘फायर ॲक्शन प्लॅन’ला निधीचा खोडा अमरावती : विदर्भात जंगल, नैसर्गिक संपदा आणि ...

मार्चमध्ये तापमान वाढले, तोकड्या सुविधा, मनुष्यबळाचा अभाव, ‘फायर ॲक्शन प्लॅन’ला निधीचा खोडा

अमरावती : विदर्भात जंगल, नैसर्गिक संपदा आणि वन्यजिवांची समृद्धी आहे. मात्र, जंगलांना दरवर्षी लागणारा वनवणवा रोखणे वनविभागापुढे ‘चॅलेंज’ ठरले आहे. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने वनवणवा कमी प्रमाणात होता. मात्र, यंदा फेब्रुवारीपासून जंगलात आग लागण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अमरावती नजीकच्या पोहरा, भानखेड जंगलात वनवणवा सुरूच आहे.

विदर्भाचे जंगल विस्तीर्ण आहे. या जंगलात विविध प्रकारांचे वन्यजीव, पशू, पक्षी आणि वनसंपदा आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जंगलात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, राज्य शासनाचे वनविभागाकडे दुर्लक्ष चालविल्याने ‘फायर ॲक्शन प्लॅन’ करूनही प्रस्तावित निधी मिळाला नाही, अशी माहिती आहे. गत आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या भागातील जंगलात वनवणवा लागण्याची घटना घडली होती. टिपेश्वर येथील जंगलात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी उपस्थित राहून वनवणव्यावर नियंत्रण करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, हे विशेष.

वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वनक्षेत्रात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, वनाधिकारी कारवाईचे लक्ष्य असतील. अमरावती विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. गत १० ते १२ वर्षांपासून वनक्षेत्रात लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता, ते क्षेत्र लक्ष्य केले आहे.

------------------

वनवणवा रोखण्यासाठी अशा आहेत उपाययाेजना

जंगलात जाळ रेषा तयार करणे. आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन. ग्रास कटर. अग्निरक्षकांची नेमणूक. व्याघ्र प्रकल्पातील राखीव वने. प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी वॉच टॉवर. वन राऊंडनिहाय वनकर्मचाऱ्यांकडे जीपीएस. स्वतंत्र वाहनाची सुविधा.

----------------------

मेळघाट, बुलडाणा, अमरावती व अकोला येथील जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कृत्रिम आगी लावणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. मार्चपासून वनवणव्यात वाढ झाली आहे. पण, आग नियंत्रणासाठी निधीची कमतरता आहे.

- हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वनाधिकारी, अमरावती.