शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बेलोऱ्याच्या अभिमन्यूने भेदले अचलपूरचे चक्रव्यूह

By admin | Updated: October 25, 2014 02:02 IST

लोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात.

सुरेश सवळे चांदूरबाजारलोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात. ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचे कसब शासकीय धुरंदर पार पाडतात. हे कसब ज्यांना जमले तो यशस्वी झालाच म्हणून समजा. अशातच विविध पक्षांनी रचलेल्या चक्रव्युहात एका अपक्ष उमेदवाराने तिसऱ्यांदा विधानसभेत धडक दिली. अचलपूर विधानसभा मतदारसंघाने रचलेला हा विक्रमच म्हणावा लागेल.बच्चू कडू हे एक अजब रसायन आहे, हे राज्याचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी उच्चारलेले वाक्य त्यांच्या या विजयामुळे तंतोतंत खरे ठरले. अचलपूरची रचना तशी आगळी वेगळी आहे. या मतदारसंघात बहुजन जातींचे प्राबल्य असले तरी कोणत्याही एका जातीच्या भरवशावर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. एका जातीचे पाठबळ असले तरी विविध जातींच्या ‘टेक्या’शिवाय उमेदवार यशस्वी होऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.अचलपूर मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. यात काँग्रेस, भाजप, बसपा सारख्या राष्ट्रीय पक्षाचे तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं सारख्या राज्यस्तरावरील पक्षाचेही उमेदवार होते. याशिवाय अपक्षांचा भरणासुद्धा बऱ्यापैकी होता. या दिग्गजांच्या चक्रव्यूहाला भेदणे कोणत्याही अपक्ष आणि राजकीय पक्षाचे पाठबळ नसलेल्या बच्चू कडू यांना शक्य होणार नाही, असाच समज काही राजकीय समीक्षकांनीही व्यक्त केला होता. त्यातही मोदी लाटेत आता बच्चू कडू पार वाहून जाणार, असे चित्र होते. परंतु कडूंच्या पारड्यात वाढलेली मुस्लीम मतदारांची टक्केवारी जमेची बाजू ठरली. मतदारसंघातील इतर उमेदवारांप्रमाणे त्यांच्याही सभा, रॅली झाल्या. यात त्यांचे बळ दिसत होते. दोनदा आमदार असूनही ते शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले. गेल्या दोन निवडणुकीत बच्चू कडूंना ज्या-ज्या नेत्यांनी मदत केली ते यावेळी स्वत:च रिंगणात असल्यामुळे बच्चुंच्या विजयाची कोणीही शाश्वती देत नव्हते. स्वत: बच्चू कडू, त्यांचे कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांशिवाय सगळेच त्यांच्या ‘हॅटट्रिक’विषयी शंका-कुशंका व्यक्त करीत होते. २१ फेरींच्या मतमोजणीतही उत्कंठा वाढतच होती. १५ व्या फेरीच्या अखेरीस भाजपचा उमेदवार १८६४ मतांनी आघाडीवर होता तर काँग्रेसचा उमेदवार बसपाच्या उमेदवारापेक्षाही दोन हजारांनी माघारला होता. १६ व्या फेरीअखेर कडू केवळ २४५ मतांनी पुढे होते. ही आघाडी २१ व्या फेरीअखेर १० हजार १७० वर पोहोचली आणि ‘कलंदर’ बच्चू कडूंचा ‘चमत्कार’ लोकांना अनुभवता आला. अचलपूर आणि परतवाड्यात बसपाने घेतलेली मते अनुक्रमे १२०१२ व ४९५९ तर काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली मतांमधील तफावत पाहता हे मतदान बच्चू कडूंच्या पथ्यावर पडले. हाकेला ‘ओ’ देणारा, सतत संपर्कात राहणारा उमेदवार असल्याने बच्चूंना म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा उचलून धरले आणि तो ठरला निवडणुकीचे चक्रव्यूह भेदणारा ‘अभिमन्यू’. अचलपूर येथील ही निवडणूक ऐतिहासिक ठरली ती याच कारणामुळे.