शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By admin | Updated: April 11, 2017 00:26 IST

शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आढावा बैठक : प्रकल्पग्रस्तांना त्वरित वाढीव मोबदला द्या अमरावती : शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जलसंपदा विभागाच्यावतीने झालेल्या अनेक प्रकल्पांचे पुनर्वसन रखडले. यासंदर्भाचे वृत्त "लोकमत"ने लोकदरबारात मांडले होते. याची दखल घेऊन आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा, भूसंपादन पुनर्वसन, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी घेतली. अचलपूर मतदारसंघात होत असलेल्या पेढी प्रकल्पासाठी हातुर्णा, गोपगव्हाण कुंड सर्जापूर येथील, काही ठिकाणी पुनर्वसन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही, तो पर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीला हात लावू नये असेही त्यांनी अधिकारयांना सांगितले. या बैठकीसाठी हातुर्णा व बोरगाव दोरी येथील शेतकरी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या योजनेत पाणीटंचईग्रस्त १५ गावे नव्याने समाविष्ट करण्यात यावे अशा सूचना आ. कडू यांनी दिल्या. ईतरही मतदार संघातील विविध विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला त्यामुळे सदर बैठक रंगली होती. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईवर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राम सिद्येभट्टी, जीवनप्राधीकरणच्या कार्यकारी अभियंता श्वता बॅनर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षिरसागर, जीवनप्राधीकरणचे उपविगीय अभियंता अरविंद सोनार, अचलपुरचे गटविकास अधिकरी रायबोले, जिल्हपरिषदेचे उपअभियंता डोंगरे, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत येऊले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शोटू महाराज आदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. वाढीव मोबदला देण्याची मागणीशेतकाऱ्यांची जमिनी अधिग्रहीत करते वेळी ८४ हजार रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात आला. आता जमिनीची किंमत वाढली असून कलम ४ नुसार जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरु आहे. त्यांना आजच्या किमतीनुसार वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी केली.