शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

केंद्रीय पथकाचा जिल्हा दौरा वांझोटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

या नैसर्गिक आपत्तीच्या महिनाभरानंतर केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंग यांनी शुक्रवारपासून तीन दिवस पश्चिम विदर्भातील बाधित खरिपाची पाहणी केली. यामध्ये त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक बाधित असलेल्या नांदगाव तालुक्यातील जळू, दाभा, माहुली चोर आदी गावांना भेटी दिल्यात मात्र, दोन मिनिटांचाही अवधी त्यांनी दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देबागायती, फळपिके बेदखल : नुकसानाच्या महिनाभरानंतर दोन मिनिटांची भेट

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवकाळी पावसाने १० दिवस कहर केल्यानंतर तब्बल महिनाभराने केंद्रीय पथक पाहणीसाठी आले. तोवर शेतकऱ्यांनी रबीसाठीची मशागत केली. बुरसी आलेले सोयाबीन मिळेल त्या भावात विकले. त्यामुळे पथकाला नुकसानाची तीव्रता कशी कळेल, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. पथकाने नांदगावात विश्रामासाठी तासभर घालविला. मात्र, शेतकऱ्यांशी संवाद साधायला त्यांनी केवळ दोन मिनिटे दिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल, याविषयी शंकाच उपस्थित होत आहे.या नैसर्गिक आपत्तीच्या महिनाभरानंतर केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंग यांनी शुक्रवारपासून तीन दिवस पश्चिम विदर्भातील बाधित खरिपाची पाहणी केली. यामध्ये त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक बाधित असलेल्या नांदगाव तालुक्यातील जळू, दाभा, माहुली चोर आदी गावांना भेटी दिल्यात मात्र, दोन मिनिटांचाही अवधी त्यांनी दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राज्याच्या सत्ताकारणात लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत. प्रशासन बेलगाम आहे. केंद्रीय पथकाचा दौरा लिलापोती करीत असल्याने शेतकºयांची व्यथा ऐकणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ९४ टक्के शेतकऱ्यांच्या शेती व फळपिकांचे ७८ टक्के नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्याचे अहवालाअंती स्पष्ट झाले. यामध्ये तीन लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील खरिपाची पिके नष्ट झाली. यामध्ये कॅशक्रॉप असणारे सोयाबीन दोन लाख १२ हजार ३२९ हेक्टर व पांढरे सोने असलेल्या कपाशीचे एक लाख ३५ हजार ४७२ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सवंगणी केलेले सोयाबीन जाग्यावरच सडले, काहींनी गंजी लावल्या होत्या, त्याला बुरशी लागली व शेंगांना कोंब आले. कपाशीची बोंडे सडली व जी बोंडे फुटली, तो कापूस ओला झाला व सरकीमधून कोंब निघाले. कापूस व सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. ज्वारीची कणसे काळवंडली, त्यामधील दाण्याला बिजांकुर निघाले, एकंदरित दहा दिवसांच्या अवकाळीने खरिपाची दैना झाली.रबीसाठी मशागत; नुकसान दिसणार कसे?आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नुकसान झाले, त्याच्या तब्बल महिनाभरानंतर केंद्राचे पथक पाहणीसाठी आले. तोवर शेतकºयांनी रबीच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत केल्यामुळे बाधित सोयाबीनचे केवळ अवशेष पथकाला दिसले. शिवाय कपाशीची सडलेली बोंडे गळून पडली. यामध्ये नुकसानीची तीव्रता जी ऑक्टोबर महिन्यात होती, ती नोव्हेंबरच्या अखेरीस येणार कुठून, असा शेतकºयांचा सवाल आहे.मिळेल त्याभावात विकले डागी सोयाबीनअवकाळीने सोयाबीनच्या गंजीला बुरशी चढली. त्यामुळे सोयाबीन डागी झाले. परिणामी मिळेल त्या भावात शेतकºयांनी सोयाबीनची विक्री केली. ही स्थिती केंद्रीय पथकाला कशी दिसणार? यामध्ये एकूण उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. जगावं कसं, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. थकबाकीदार असल्याने बँकांनी कर्ज दिल नाही. ५० हजारांवर शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही. रबीच्या कर्जवाटपास सुरुवात नाही. जिल्हा रबीचे कर्ज वाटप करीत नाही. याकडे लक्ष देणार कोण, असा शेतकºयांचा सवाल आहे.बागायती अन् फळपिकांच्या नुकसानीचे काय?अवकाळीने पपई, केळी, भाजीपाला आदी बागायती पिकांसह संत्रा, मोसंबी आदी बहुवार्षिक पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संत्राची फळगळ झाली. याची पाहणी पथकाने केलीच नाही. संयुक्त पंचनाम्यातदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. फळगळ झाल्याने व्यापारी सौदे करायला तयार नाही. शासन, प्रशासन, पथक अन् लोकप्रतिनिधींना वेळ नाही. त्यामुळे बागायती उत्पादकांना वाºयावर सोडल्याची स्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती