शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

By गणेश वासनिक | Updated: December 6, 2022 17:04 IST

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार

अमरावती : शहरी भागालगतच्या वनक्षेत्रावरील अतिक्रमण आणि धार्मिक स्थळांची निर्मिती ही गंभीर समस्या उद्‌भवल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने अशा वनक्षेत्रांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. शहरालगतच्या वनक्षेत्राची सीमा निश्चित करून ते क्षेत्र संरक्षण कुंपणाने बंदिस्त केले जाणार आहे. त्याकरिता केंद्र सरकारचे वने व पर्यावरण मंत्रालय स्वतंत्र निधी देणार आहे. 

शहरालतच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण करणारी टोळी सक्रिय झाली आहे. वनजमिनीवर अतिक्रमण करायचे, ते परस्पर विकायचे हा व्यवसाय काही ठिकाणी सुरू आहे. एवढेच नव्हे तर शहरालगतच्या वनक्षेत्राच्या क्रिम जागा गिळंकृत करण्यासाठी बिल्डर्स लॉबीदेखील कार्यरत आहे. प्रशासनाला हाताशी धरून वनजमिनी मिळविण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे शहरालगत वनक्षेत्र रेकॉर्डवर वेगळेच दर्शविले जाते.

प्रत्यक्षात या वनक्षेत्रावर अतिकमण, धार्मिक स्थळांचा कब्जा आहे. मात्र, वने व पर्यावरण मंत्रालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून शहरालगतच्या वनक्षेत्राचे संरक्षणासाठी उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहे. शहरालगतची वनजमिन नेमकी किती? याचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर उपलब्ध वनक्षेत्राच्या संख्येनुसार या वनजमिनीवर जीपीएस प्रणालीच्या आधारे तारेचे कुंपण, संरक्षण भिंत अथवा सिमेंटचे पोल उभारून वनक्षेत्राची निश्चिती केली जाणार आहे.

या शहरात वनक्षेत्रावर अतिकमणाची समस्या

नंदूरबार, ठाणे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, नाशिक,जळगाव, धुळे, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या शहरालगतच्या वनक्षेत्रावर निवासी अतिक्रमण, धार्मिक स्थळे निर्माणाधिन आहेत.वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

राज्यात कोणतेही शहर असो. वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणास वनाधिकारी जबाबदार आहेत. शहरालगतच्या वनक्षेत्रावर अतिकमण वा धार्मिक स्थळांची निर्मिती होत असताना ते तात्काळ हटविले जात नाही. त्यामुळे अतिक्रमण धारकांना ते फावत असून, त्यांचे मनसुबे बळावते. त्यामुळेच अमरावती शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण, धार्मिक स्थळे आजही कायम आहे. वरिष्ठ वनाधिकारी तीन वर्षांसाठी कर्तव्य बजावण्यासाठी येतात. परंतु, कुणीही वनक्षेत्रावरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवित नाही, हे वास्तव आहे.‘त्या’ वनक्षेत्रांवर रोपवन, गार्डन

राज्यात आतापर्यंत शहरालगतच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण झाल्यामुळे सुमारे पाच हजार हेक्टर वनजमिन गिळंकृत झाली आहे. मात्र, शहरालगतच्या वनक्षेत्राची सीमा निश्चित करून त्यावर रोपवन, गार्डन किंवा कर्मचारी वसाहती साकारण्याचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावतीCentral Governmentकेंद्र सरकारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार