शेतकरी संघटना आक्रमक : शेतकरी कधी ठरविणार बाजारभावदर्यापूर : तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी येथील बाजार समितीमध्ये बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचे निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये निषेधाचा फलक लावण्यात आला. शेतकरी हा शेतामध्ये राबराब राबतो व आपला माल विकण्याकरिता बाजाराला आणतो तर त्याला शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही व तो आपल्या मालाचा मालक नाही. मागील वर्षीचे तूर, मूग, उडिद, सोयाबीन, कांदा पिकांचे भाव व आजचे निम्म्यावर आलेले बाजारभाव बघता शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत तोटा होत आहे. परंतु तरीही केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांकरिता कोणताच धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन करण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रदीप गावंडे, रमेशसिंग शेखावत, साहेबराव वाटाने, रवींद्र ठाकूर, बाळकृष्ण भिसे, प्रमोद पाचडे, अंबादास कडू, अशोक कथे, अशोकराव राने, मनोहरराव कावरे, दिनेश ब्राह्मणकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बाजार समितीत लागले केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाचे निषेध फलक
By admin | Updated: September 11, 2016 00:16 IST