शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सावधान, लिंबू सरबतही घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:45 IST

मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.

ठळक मुद्देअखाद्य बर्फाचा वापर : उन्हाळ्यात होतो मोह

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४३ अंशापर्यंत पोहचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालूस उत्पन्न होते. लिंबू सरबत, कोल्ड्रींक्स आणि इतर शीतपेयांच्या गाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोेन ग्लास शितपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे लिंबू सरबत नागरिकांना खास आकर्षित करते. परंतु हे सरबत पित असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे.सरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केला असल्याने हे सरबत पिल्याने यामुळे टायफाईड व अतिसार सारखे आजार होवू शकतात. लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केलेला असेल तर अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शितपेय, लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. कोल्ड्रींकपासून शरीरावर होणाऱ्या विपरित परिणांमावर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी त्यांचा मोर्चा लिंबू सरबताच्या गाड्यांकडे वळविला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळविण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात. यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते. याही पेक्षा घातक प्रकार म्हणजे काही ठिकाणी तर येथील शवच्छिेदन केंद्रात वापरल्या जाणाºया बर्फाच्या लादीचा देखील सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची चर्चा आहे.अखाद्य बर्फाचे दूषित पाणी पोटात गेल्याने कावीळ, लिव्हरचे आजार, डायरिया, पोटाचे विकार असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे राहते.- डॉ. राजेश मुंदे,एमडी.