शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती राज्यमहामार्गावरच उभी राहतात गुरे; अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 11:10 IST

तळेगाव - आष्टी राज्यमहामार्गावर गुरे जंगलात चरायला जाण्याअगोदर सकाळी सात वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत ऐन रोडवर उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असुन ही गुरे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

ठळक मुद्देरहदारीला अडथळाजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: तळेगांव (शा.पं.) येथील गावालगत जात असलेल्या तळेगाव - आष्टी राज्यमहामार्गावर गुरे जंगलात चरायला जाण्याअगोदर सकाळी सात वाजतापासून ते दहा वाजेपर्यंत ऐन रोडवर उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असुन ही गुरे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या गुरांबाबत संबंधितांकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तळेगांव आष्टी राज्य महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ला जोडलेला आहे या राज्य महामागार्चे नुकतेच रुंदिकरन करण्यात आले असून गावाजवळ सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबर अवजड वाहनांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावेश आहे. सतत वर्दळीच्या या राज्य महामार्गावर मात्र सकाळी ७ ते १० या कालावधीत जंगलात चरायाला जाण्याअगोदर गुरे प्रचंड प्रमाणात आणुन उभी राहत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच गावात मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन गावातील रोडवर, उड्डाण पुलाखाली, आर्वी रोडवर, राष्ट्रीय महामार्गावर क्रं. सहा वर सुद्धा रात्री मोकाट गुरे बसत असल्याने अंधारात रस्त्यात बसलेली गुरे नजरेस न आल्यामुळे अपघात घडून अनेक जण जखमी, तर काहींना कायमचे अपंगत्व आले तर अनेक गुरांचा जीव गेला असल्याच्या कित्येक घटना घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. गुरांच्या या कळपामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा होते. सकाळी आष्टी रोडवर उभी ठेवण्यात येत असलेली गुरे तसेच गावातील मोकाट गुरांच्या उपाययोजने बाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले असून याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

 

 

टॅग्स :cowगाय