शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘सीएए’: हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारा कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 22:15 IST

डॉ.बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेवर घाला घालण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

चांदूर रेल्वे (अमरावती) : देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचा मोदी-शहा जोडीचा अट्टाहास हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारा असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केली. सीसीए व एनआरसी या दोन कायद्यांच्या विरोधात चांदूर रेल्वे येथे रविवारी लोकजागर सभा घेण्यात आली. त्यावेळी आव्हाड बोलत होते. देशभरात दारिद्र्य, महागाई, आर्थिक मंदी आदी डझनावर प्रश्न प्रलंबित असताना सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वळविण्यसाठी केंद्र सरकारने कायद्याच्या नावावर षड्यंत्र रचल्याचा आरोप ना.आव्हाड यांनी केला.

डॉ.बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेवर घाला घालण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी विद्यार्थी नेता उमर खालीद यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारने कायद्याच्या नावावर अल्पसंख्याकांची गळचेपी चालविल्याचा आरोप खालीद यांनी केला. जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व बजरंग दलाचे गुंड घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारकडून सर्वसामान्यांवर हे अत्याचार होत असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण जागर चालविला असल्याचे खालीद म्हणाले. दरम्यान गृहनिर्माण ना. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारमधील मोदी, शहा या जोडगोळीवर टीकास्त्र सोडत सीएएचा जोरदार विरोध केला. 

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम भस्मे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सुनील मेटकर, मौलाना तनशीब, प्रभाकर वाघ, प्रदीप वाघ, गणेश रॉय, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी उपस्थित होते. लोकजागर सभेचे संचालन प्रसन्नजीत तेलंग यांनी, तर प्रास्ताविक सागर दुर्गोधन यांनी केले. सभेला चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड