शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 14, 2023 21:11 IST

दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

अमरावती : कुणालाही नको असणारा उच्चांक सध्या जिल्ह्यात झालेला आहे. यंदाच्या १० महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. तर सन २००१ पासून तब्बल ५२१० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्यूला कवटाळले आहे. दर ३० तासात एक शेतकरीमृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विभागातील बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातदेखील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. विभागात यंदाच्या दहा महिन्यात तब्बल १९२७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, वसुलीसाठी तगादा, आजारपण, मुलींचे लग्न आदी प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन मृत्यूचा फास घेत आहे.

यंदा जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी १४, मार्च ३०, एप्रिल ३२, मे २८, जून २९, जुलै २६, ऑगस्ट २६, सप्टेंबर ३४ व ऑक्टोबर महिन्यात २० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू