शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांवर वाढला कामांचा बोझा

By admin | Updated: September 9, 2015 00:15 IST

राज्यातील २५ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी मागील दोन वर्षांत २० दिवस आपल्या न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले.

कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत : दोन वर्षांत २० दिवस आंदोलनमोहन राऊ त अमरावतीराज्यातील २५ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी मागील दोन वर्षांत २० दिवस आपल्या न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले. परंतु शासनाने मागण्या पूर्ण केल्या नसल्यामुळे नव्या भाजप सेना युतीच्या शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत़ एकीकडे क वर्गाची भरती बंद केली तर दुसरीकडे रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा बोझा वाढल्यामुळे कार्यरत कर्मचारी मानसिक तणावाखाली वावरत आहे़राज्यातील अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत नायब तहसीलदार संवर्गामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या दोन संवर्गातून पदोन्नतीने भरावयाच्या पदाचे प्रमाण शासनाने निश्चित केले. परंतु सर्वच विभागातील अव्वल कारकून संवर्गाची मंजूर पदसंख्या लक्षात घेता शासनाने अन्याय केल्यामुळे राज्यातील महसुल संघटनेने निदर्शने, काळ्या फिती लावणे तदनंतर कामबंद असे आंदोलन सन २०१३ मध्ये १६ ते २० आॅगस्टपर्यंत केले तर गतवर्षी १ ते ५ आॅगस्टपर्यंत पुन्हा आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महसुल संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री, व संबंधित खात्याच्या सर्व विभाग प्रमुखांना अनेक वेळा भेटी घेऊन आपल्या संघटनेची कैफियत मांडली. परंतु कोणत्याच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आता नव्या शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत़महसूल विभागाकडे तसेच दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कामाची जबाबदारी असते त्याच बरोबर कायदा व सुव्यवस्था, जमीन महसूल, ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका, सार्वजनिक वितरण प्रणाली, कूळ वहिवाट दावे, संजय गांधी योजनेअंतर्गत सात योजना, पुनर्वसन, फौजदारी स्वरूपाची कामे, जनगणना, मतदार नोंदणी, भूसंपादन, रोजगार हमी, कमाल जमीन धारणा कायदा त्याच बरोबर आधार कार्डसह केबल सर्व्हे सारखी सतराशे साठ कामे महसूल विभागाला करावे लागते़ महसूल विभागात अव्वल कारकून, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कार्यरत आहे़ एका बाजुला शैक्षणिक क्षेत्रासह दुसऱ्या विभागाचा विचार करता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र त्या प्रमाणात गत सरकारने माप टाकले नाही़ कामाची वेळ आठ तासांची पण प्रत्यक्षात बऱ्याच वेळा १२-१२ तास कामे करावी लागतात़ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे़