शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

-------------- सर्वसामान्यांना दिलासा देणारे हा कोरोनाकाळातील अर्थसंकल्प आहे. दरवाढीचा विस्फोट थांबविण्यासाठी अनेक तरतुदी केंद्र शासनाने केल्या आहेत. त्यामुळे व्यापारवृद्धीला ...

--------------

सर्वसामान्यांना दिलासा देणारे हा कोरोनाकाळातील अर्थसंकल्प आहे. दरवाढीचा विस्फोट थांबविण्यासाठी अनेक तरतुदी केंद्र शासनाने केल्या आहेत. त्यामुळे व्यापारवृद्धीला आगामी काळात चालना मिळेल. पेट्रोल, डिझेल दरांचे नियंत्रणच सरकारकडे नाही, तर त्याचे नियमन कसे होणार? या अर्थसंकल्पाने कोरोनापश्चात देशांतर्गत चलन खेळते राहील.

- मिथून निशान, किराणा व्यापारी, अर्जुननगर

--------------

‘आत्मनिर्भर भारत’कडे वाटचाल करणारा केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदा एका खमक्या स्त्रीने सादर केला आहे. अर्थसंकल्पानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याकडे कल असतो. मात्र, यंदा हे इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या सेसमध्ये वाढ केल्यामुळे त्यांनाही दिलासा मिळेल.

- रविराज देशमुख, पेट्रोल पंप चालक

--------

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या सुसह्य करण्यासाठी नऊ टक्क्यांपर्यंत तरतूद करण्यात आली. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पर्यटन क्षेत्रात सूट मिळाली असती, तर हा आनंद द्विगुणित झाला असता. एकंदर अर्थसंकल्प चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही कोरोना लसीकरणात राखीव कोटा असायला हवा होता.

- डॉ. विजय कळंबे, ज्येष्ठ नागरिक, अर्जुननगर

------------

अर्थसंकल्पात गरीब, सामान्यांसाठी काहीच नाही. केवळ आकड्यांचा खेळ आहे. कामगार, शेतमजूर, बेरोजगारांसाठी भरीव पॅकेज नाही. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पाने दिलासा दिला नाही. गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच होतील, हे या अर्थसंकल्पाने निर्देशित केले.

- अशफाक खान, ऑटोचालक, अमरावती

--------------

शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करीत अर्थसंकल्प सादर झाला असला तरी सर्वसामान्य व किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेत्यांसारख्या किरकोळ घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही. उपकरामुळे भाजीपाला महाग होईल. विशिष्ट वर्गाचे हित जोपासण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.शेवटच्या माणसाला अर्थसंकल्पात पारसे स्थान देण्यात आलेले नाही.

- अजय भालेराव, भाजीपाला विक्रेता, बडनेरा

----------------

सिलिंडर व भाज्यांचे दर कितपत स्थिर राहतात, यावरच अर्थसंकल्पातील तरतुदींचे यशापयश राहणार आहे. स्वयंपाकगृह सांभाळताना खर्चाबाबत नाकीनऊ येत आहेत. वरकरणी तरतुदी दिलासादायक दिसत असल्या तरी त्यावर अंमलबजावणी आवश्यक आहे.

- पूनम वंदे, गृहिणी, न्यू फ्रेन्ड्स कॉलनी

-------------

कोरोनामुळे हॉटेल बंद होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अर्थसंकल्पात पर्यटनावर भर देण्यात आला आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांसाठी सवलततीच्या थेट घोषणा नाहीत. हा अर्थसंकल्प उद्योजकांच्या फायद्याचा नाही.

- नितीन कदम, उद्योजक, अमरावती

--------------

जोड येत आहे.