शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

श्वानांची भरमसाठ पैदास, खरेच निर्बीजीकरण झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:05 IST

शहरातील श्वानांची वाढती पैदास पाहता खरेच त्यांचे निर्बीजीकरण झाले काय, असा प्रश्न पशुप्रेंमीना पडला आहे.

ठळक मुद्देहालच हाल : रोगराई, अन्नाच्या कमतरतेने ओढावताहेत मृत्यू

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील श्वानांची वाढती पैदास पाहता खरेच त्यांचे निर्बीजीकरण झाले काय, असा प्रश्न पशुप्रेंमीना पडला आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार, शहरात नऊ हजार श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली असती, तर श्वानांच्या पैदासीला बे्रक नक्कीच लागला असता. परंतु, श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे त्यांना अन्नाची कमतरता भासत आहे, विविध रोगांनी ग्रस्त चार ते पाच श्वान दररोज दगावत आहेत तसेच अपघातात बळी जात असल्याची खंत पशुप्रेमींनी व्यक्त केली आहे.निर्बीजीकरण शस्त्रक्रियेची योग्य प्रक्रिया पार न पडल्यामुळे शहरात श्वानांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. या वाढत्या संख्येमुळे श्वानांवर भूकबळीचे संकट ओढावले असून, ते विविध आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.'केनाइन डिस्टेम्पर’चा विळखाश्वानार्थ सेवा देणाºया वसा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील श्वानांची भयावह स्थिती उघड झाली आहे. शहरात पाच ते सहा हजारांपर्यंत श्वान असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मग महापालिकेने नऊ हजार श्वानांचे निर्बीजीकरण कसे केले असावे, हा प्रश्नही निर्माण होत आहे. या श्वानांपैकी सुमारे अडीच हजार श्वान हे 'केनाइन डिस्टेम्पर’ व ‘पारो’ या रोगाने ग्रस्त आहे. या रोगाचे शहरात थैमानच असून, मागील चार आठवड्यांमध्ये टोपेनगरातील सहा श्वानांचा डिस्टेम्पर या रोगाने मृत्यू झाला. महापालिका कर्मचारी श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करतात. त्यांचे कान कापून निर्बीजीकरणावर शिक्कोमोर्तब करतात. ७० टक्के श्वानांचे कान कापले असल्याचे वसाने निरीक्षण नोंदविले आहे. मात्र, श्वानांची वाढती पैदास निर्बीजीकरण शस्त्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.कुपोषित कुत्री, सात पिले जीवन-मरणाच्या दारातकुलगुरूंच्या बंगल्याशेजारी बेवारस मादी श्वानाने सात पिलांना जन्म दिला. मादीला पुरेसे अन्न मिळत नसल्याने ती कुपोषित झाली, तर तिच्या पिलांनावरही उपासमारीची पाळी आली आहे. वसाच्या पदाधिकाऱ्यांनी या आठ प्राण्यांंची जबाबदारी स्वीकारली असून, अन्न पुरविण्याचे काम ते करीत आहेत.संसर्गजन्य रोगांचा माणसांनाही धोका'डर्माटिटीस व स्कॅबिट हे श्वानांना उद्भवणारे त्वचारोग आहेत. भटक्या श्वानांच्या संपर्कात आलेल्या मानवालाही या रोगांचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांना गोड, तिखट, खारट अन्नपदार्थ देऊ नका, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी अनिल कळमकर यांनी केले आहे.परिसर बदलल्याने सर्वाधिक मृत्यूमहापालिकेचे पथक श्वानांना पकडून निर्बीजीकरण करतात आणि त्यांना दूरच्या परिसरात नेऊन सोडतात. मात्र, परिसर बदलला की, जगण्याचा संघर्ष नव्याने सुरू होतो. भांडणात किंवा पलायन करताना अपघातात मुत्युमुखी पडतात. अशाप्रकारे श्वानांच्या मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचे निरीक्षण वसाचे आहे.श्वानांसाठी ते देवदूतचवसा सस्थेचे पदाधिकारी जखमी व आजारी श्वानांसाठी देवदूतच आहेत. वसाचे शुभम सायंके, सुमीत देशपांडे, भूषण सायंके, रोहित रेवाळकर, राहुल सुखदेवे, तुषार वानखडे, गणेश अकर्ते हे संकटग्रस्त श्वानांच्या मदतीसाठी धावून जातात. आजपर्यंत त्यांनी हजारांवर श्वानांच्या उपचारासाठी धडपड केली आहे. श्वानांची संख्या वाढल्याने खायला पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे कुपोषणाचे बळी ठरत आहेत. अशा श्वानांसाठी वसाचे पदाधिकारी देवदूतच ठरले आहेत.श्वानांची वेळोवेळी तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे.- अनिल कळमकर, पशुधन विकास अधिकारी.निर्बीजीकरण शस्त्रक्रिया फसल्याने संख्या वाढली आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने श्वान कुपोषित होत आहेत.- शुभम सायंके, वसा