शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आचारसंहितेमुळे राज्यात ‘अभिनव’ला ब्रेक, सहकाराचे 90 कोटी परत जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 20:51 IST

शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे.

मोहन राऊत/अमरावती

शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे, जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योग सुरू करणे यासाठी राज्यात सुरू केलेल्या अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ला आदर्श आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागले आहेत. सहकार विभागाला दिलेला ४९० कोटींचा निधी मार्चअखेर खर्च होत नसल्याने तो वित्तविभागाला परत जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व आर्थिक वर्षाचा मार्च महिना एकाच वेळी आल्याने खर्च न होणारा निधी शासनतिजोरीत जमा होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने २ जानेवारी रोजी अध्यादेश काढून सहकारला पाठबळ देण्यासाठी अटल अर्थसाहाय्य योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना सहकारी संस्थांमार्फत कृषिक्षेत्राशी व स्थानिक गरजेशी संबंधित सेवा व्यवसाय व उद्योग उभे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

४० लाखांचा प्रकल्प भाजीपाला स्वच्छता यंत्र, गोदाम, दुय्यम प्रक्रिया युनिट, मोबाइल रिटेल वेअर शॉप, जलशुद्धीकरण यंत्र, कृषिमाल पॅकेजिंग, कापडी पिशव्या निर्मितीसाठी ४० लाखांचा निधी  सहकार विभागाकडून देण्यात येतो. जिल्हा उपनिबंधक, विभागीय  सहायक निबंधक यांच्या दोन समित्यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर राज्य समितीचे अध्यक्ष असलेले सहकार मंत्री या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देतात. सहकार विभागाकडे अल्प प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातच आचारसंहिता लागली आहे. 

३५५ तालुक्यांसाठी ४९० कोटी सहकार विभागाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५५ तालुक्यांसाठी ४९० कोटी रुपयांची तरतूद  केली होती. मार्च अखेरपर्यंत हा निधी खर्च करणे अपेक्षित होते. सन २०१८-१९ मध्ये या योजनेच्या प्रथम वर्षाच्या अंमलबजावणीच्या मूल्यमापनानंतर सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबत शासनाला निर्णय घेता येणार आहे.

जिल्ह्यात अटल अर्थसाहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी १४ तालुक्यांकरिता १९  कोटी ३२ लाखांची तरतूद सहकार विभागाने केली आहे. जिल्ह्यातील दहा प्रस्तावांना जिल्हा समितीने मंजुरात देऊन, ते सहकार विभागाकडे पाठविले आहेत.- एस.यू. जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती 

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती