शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तुरीच्या भावात विक्रमी घसरण

By admin | Updated: December 22, 2016 00:30 IST

काही दिवसांत नवीन तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर तुरीचे भाव कमालीचे गडगडले आहेत.

सहा महिन्यांत निम्म्याने घट : व्यापाऱ्यांचे चांगभले, शेतकरी अडचणीत अमरावती : काही दिवसांत नवीन तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर तुरीचे भाव कमालीचे गडगडले आहेत. जून-जुलै महिन्यात दहा हजारापर्यंत गेलेले तुरीचे भाव आता ४५०० रूपयांपर्यंत घसरले आहे. किंबहुना ४५०० ते ५ हजार रूपयांपर्यंत स्थिरावले आहे. त्यामुळे नवीन तूेर बाजारात आल्यावर कोणते दर राहतील, याची चिंता शेतकऱ्यांना सताऊ लागली आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असताना तुरीने शेतकऱ्यांना थोडाफार आधार दिला होता. यंदा पावसाळा समाधानकारक असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीला पसंती दिली गेली. पेरणीच्या दोन महिन्यात संततधार पावसामुळे ५० हजारावर हेक्टरमध्ये तूर पिकावर ‘मर’ रोग आला. यामधून शेतकरी सावरला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तूर बहरली. परंतु आता कोसळलेल्या भावाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. यंदाची नवीन तूर बाजारात येण्याच्या मार्गावर असताना दररोज दर कोसळणे सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी तुरीचा भाव १० हजारावर व तूरडाळ १७५ रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. आता मात्र तुरीला कवडीमोल भाव आहे. देशाच्या सर्वच भागात तुरीचे पीक चांगले आहे. सध्या तुरीला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नाही. त्यामुळे तुरीचे दर गडगडल्याचे व्यापारी सांगतात. यंदा सोयाबीन, कपाशी पाठोपाठ तुरीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीपात धारणी तालुक्यात ६,७०० हेक्टर, चिखलदरा १३२६, अमरावती ९९८०, भातकुली ९२१८, नांदगाव ९५९५, चांदूररेल्वे ६५८२, तिवसा ४५२१, मोर्शी ९०००, वरुड ८२४०, दर्यापूर ९३५५, अंजनगाव सुर्जी ४९७३, अचलपूर ६१२६, चांदूरबाजार ९३९२ व धामणगाव तालुक्यात ६६९६ हेक्टर पीक सध्या शेंगा फस्त होण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर आहे. दरवाढीवर आंदोलन करणारे आता आहेत कुठे? तुरीचे भाव सहा महिन्यांपूर्वी ९५०० ते १०,००० रुपये प्रतिक्विंटल व तुरडाळीचे भाव १७५ रुपये किलो झाले होते. त्यावेळी अनेक संघटनांनी आंदोलने केलीत. आता तुरीचे भाव कवडीमोल आहेत. शेतकऱ्यांच उत्पादनखर्च निघण्याची सुतराम शक्यता नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडीत आहेत. परंतु, कोणत्याही पक्षाने भाववाढीसाठी आंदोलन केले नाही. भाव आणखी कोसळणार सहा महिन्यांपूर्वी १० हजार क्विंटलपर्यंत दरवाढ झालेल्या तुरीला सध्या ४५०० रुपये भाव मिळत आहे. परंतु हा सर्व जुना माल आहे. शेतकऱ्यांचा नवीन माल महिनाभरात बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तुरीचे भाव आणखी कोसळू शकतात. शासनाने तुरीच्या दरांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शालेय पोषण आहारात तूर परतली महागल्याने शालेय पोषण आहारातून तूरडाळ बेपत्ता झाली होती. त्याऐवजी अन्य डाळींचा वापर होत होता. वर्षभरानंतर विद्यार्थ्यांच्या आहारात तूर डाळ परत आली आहे. यापूर्वी चवळी, चणा, मूग, मटकी, मसूर डाळीचा वापर करण्यात येत होता.