शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वीर हवेत, तर वीरमाताही हव्यात !

By admin | Updated: May 10, 2015 00:40 IST

‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा ...

अमरावती : ‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा किंवा समाजसेवोच्या तत्परतेचा स्पर्श झालेला नसेल, त्यांच्यात हे संस्कार बाणलेले नसतील, तर आपल्या बालगोपालांत त्यांची पेरणी त्या करू शकणार नाहीत. मातेच्या दुधातून ते अमृताचे घोट त्यांना मिळाल्याशिवाय राष्ट्रात ती तेजस्वीता कायम राहणार नाही. तिच्यात अंशत: का होईना, असे संस्कार आल्याशिवाय तिच्या जन्माला येणाऱ्या सुपुत्रात त्यांचा पुरेपूर विकास होणे शक्य नाही. जगाच्या इतिहासावर दृष्टी टाकल्यास आपणास दिसून येईल की, जे पुरुष वीर, संत, मुत्सद्दी, समाजधुरीण किंवा श्रेष्ठ म्हणून गाजले आहेत, त्यांच्या मातांमध्ये ते गुण, बीजरुपाने वसत होते. वीरप्रसू वीरमाता ह्या अत्यंत तपस्वीनी व प्रतिकारासाठी सज्ज अशा रणचंडिका होत्या. वीर भरताची माता शकुंतला आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जीजाबाई इत्यादीकांच्या उदाहरणावरुन हे सहज कळून येईल. तशी कितीतरी उदाहरणे आमच्या भरतवर्षातीलच देता येण्यासारखी आहेत, अर्थात् राष्ट्रात महापुरुष निर्माण होण्यासाठी ‘पहिले तो करी देवकी जैसी माताएँ जगमे पैदा’ यांची जोड करुन देणे हे तितकेच आवश्यक आहे. ‘तुम्ही आपले घर सांभाळा म्हणजे झाले’ एवढेच स्त्रियांना शिकवून भागणार नाही. घर आणि राष्ट्र यांचा अविभाज्य संबंध लक्षात घेऊन आपणास घरातूनच सर्व गोष्टींना आरंभ केला पाहिजे. तुळशीसमोर रांगोळी घालताना चक्र काढूनच भागणार नाही तर त्यांना चक्राचा प्रत्यक्ष व्यवहारी उपयोग करण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले आहे. स्त्रीचे घरातील-समाजातील स्थान आणि विशेष म्हणजे माता या नात्याने स्त्रीचे कर्तव्य याबाबतही श्री गुरुदेवांनी परिणामकारक विचार व्यक्त केले आहेत. श्रीगुरुदेव या मासिकामध्ये सन १९४७ च्या एप्रिल महिन्यात राष्ट्रसंतांचे प्रसिद्ध झालेले विचार जागतिक मातृत्त्वदिनाच्या निमित्ताने खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी येथे देत आहोत...