शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उच्च न्यायालयात ‘मिशन मेळघाट’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:07 IST

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या अनुषंगाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘मिशन मेळघाट’ दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुपोषणाचे दुष्टचक्र मातामृत्यू, बालमृत्यूची दिली कबुली २५ वर्षांपूर्वीच्या समस्या आजही कायम

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या अनुषंगाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘मिशन मेळघाट’ दाखल करण्यात आले आहे. यात मेळघाटातील कुपोषणाचे दुष्टचक्र, मातामृत्यू, बाल मृत्यूची कबुली दिली आहे. २५ वर्षांपूर्वी ज्या समस्या पुढे आल्या होत्या, त्याच आजही कायम असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल ‘मिशन मेळघाट’ नावाच्या पुस्तिकेत त्यांनी मागील दहा वर्षांतील शून्य ते एक वर्ष वयोगटातील २ हजार ६४६, तर एक ते सहा वर्ष वयोगटातील १ हजार १३१ बालमृत्यू दाखवले आहेत. ११२ मातामृत्यू आहे, तर बालकांचा शून्य ते एक वर्ष वयोगट अर्भक म्हणून घेतला आहेत.२००९-१० मध्ये ३५५ अर्भकमृत्यू व १५५ बालमृत्यू, २०१०-११ मध्ये ३३५ अर्भकमृत्यू व १७४ बालमृत्यू, २०११-१२ मध्ये २६३ अर्भकमृत्यू व १५६ बालमृत्यू, २०१२-१३ मध्ये २७६ अर्भकमृत्यू व १३२ बालमृत्यू, २०१४-१५ मध्ये २४१ अर्भकमृत्यू व १०३ बालमृत्यू, २०१५-१६ मध्ये २०७ अर्भकमृत्यू व ७६ बालमृत्यू, २०१६-१७ मध्ये २८३ अर्भकमृत्यू व १३२ बालमृत्यू, २०१७-१८ मध्ये २१७ अर्भकमृत्यू व ५१ बालमृत्यू आणि २०१८-१९ मध्ये जानेवारी अखेर २२८ अर्भकमृत्यू व ५५ बालमृत्यू असल्याचे स्पष्ट केले आहे.मुंबई उच्च न्यायालयापुढे पुस्तिकेत ही जी आकडेवारी देण्यात आली आहे, ती केवळ मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील आहे. मेळघाटबाहेर जानेवारी १९ पर्यंत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील एकूण ३६८ अर्भकमृत्यू व १६४ बालमृत्यूची आकडेवारी आहे.

२५ वर्षांपासून समस्यांचा पाढाकुपोषणाचे दुष्टचक्र स्पष्ट करताना निरक्षरता, सामाजिक रूढी-परंपरा, रोजगाराअभावी होणारे स्थलांतर, व्यसनांचे प्रमाण, बालविवाह व किशोरवयातील गर्भधारणा, भौगोलिक अडचणी, कुटुंब नियोजन पद्धतीचा अभाव, आरोग्य, महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभागातील रिक्त पदे, अंधश्रद्धा, भूमकांचा प्रभाव यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. बारामाही रस्त्यांचा अभाव, दूरध्वनी अथवा मोबाइल कनेक्टिव्हिटीचा अभाव, बिनतारी संदेशवहन यंत्रणा, अ‍ॅम्बुलन्स तसेच न्यूओनेटल अ‍ॅम्बुलन्सचा अभाव या सर्व समस्या १९९३ पासून मेळघाटात आहेत. २५ वर्षांनंतरही याच समस्यांचा आधार सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.उच्च न्यायालयात अनेक प्रकरणेमेळघाटातील बाल मृत्यूच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात १३ हून अधिक प्रकरणे दाखल आहेत. यात तीन जनहित याचिका आहेत.

टॅग्स :Melghatमेळघाट