शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

लोकमतच्यावतीने जिल्ह्यात आजपासून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.

ठळक मुद्देनातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याच, महाशिबिराची अमरावतीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमत'च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अमरावती शहर उपविभाग क्र.१ चे अतिरक्त कार्यकारी अभियंता (महावितरण) प्रदीप अंधारे हे शिबिराचे उद्‌घाटन करतील. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९२७०१३१५८०

यांनी करावे रक्तदान - १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती.- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट