शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

भाजपाने के ली ऐतिहासिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला.

ठळक मुद्देराजू शेट्टी : सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला. यात कर्जमाफी नव्हे, तर शासनाने केलेली फसवणूक ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजपा-शिवसेना युती सरकारवर ताशेरे ओढले.आपण सरकारला जाब विचारण्यासाठीच येथे आलो असून पुढील आंदोलन कापूस व सोयाबीनसाठी करणार असल्याचे सूतोचाव त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे आयोजित सुकाणू समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 'शेतकरी एल्गार' मेळाव्यात ते शेतकºयांसमोर भावना व्यक्त करीत होते.यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, अचलपूर मतदारसंघाचे आ.बच्चू कडू, प्रकाश पोकळे, गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, वंदना यादव, दया राऊत, देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.खा.शेट्टी म्हणाले, मला मंत्रिपदाची आॅफर देण्यात आली. मात्र, आधी शेतकºयांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोग लागू करा, या मागण्या मी समोर ठेवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उत्पादनावर दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. ज्या हातांनी सरकारला दिल्लीच्या चाव्या दिल्या तेच हात त्यांना हाकलून लावतील. शासनाने दिवाळीपर्यंत कर्जमाफीचा घोळ सोडवावा, अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.शेतकºयांना अटी का?देश सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. हे युद्ध भारत-चीन यांच्यात असल्याचा बनाव केला जातो. मात्र प्रत्यक्षात हे युद्ध भारतविरुद्ध इंडिया यांच्यात सुरू आहे. शेतकºयांना अटी लावून कर्ज माफ केले जाते. उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी कोणतीही अट लावली जात नाही. शेतकºयांचे गंभीर प्रश्न सोडून सरकार के वळ जातीयवाद पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला.