शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

“रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 15:10 IST

व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजपमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद अमरावतीत उमटले. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अमरावती दौऱ्यावर असून, महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे, रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली. देशभरात समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात. हे नियोजित मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले, याची प्रथम चौकशी व्हायला हवी. या पाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का, या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.

आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो

काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते, मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती, तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे, हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटते ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. रझा अकादमीवर बंदी घालायची हिंमत आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

यशोमती ठाकूर १२ तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत?

यशोमती ठाकूर १२ तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांची मते कमी होणार म्हणून त्या बोलत नाहीत का? राज्यात दंगल भडकणव्यासाठी तयार करण्यासाठीचा कट होता का, त्याची चौकशी व्हावी. १२ तारखेला असाच मोर्चा अमरावतीत निघाला. त्याला परवानगी होती की नाही? होती तर कुणी दिली? ज्यांनी परवानगी दिली त्याने काय विचार करून दिली? त्याची चौकशी झाली पाहिजे. परतीच्या वेळी समाजकंटकांनी दुकाने टार्गेट केली. लोकांना टार्गेट केले. यातून दंगा घडवायचा होता. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या दुकानांना घरांना व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात आले, असा मोठा आरोप फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, अमरावती शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड झाली होती. या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अमरावतीत गेले होते. व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAmravatiअमरावती