शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेणाचा केक कापून साजरा केला झाडांचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:29 IST

वृक्षाचा शेणाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर येथे राबविण्यात आला. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला.

ठळक मुद्देवृक्षारोपणासह संवर्धनही, स्वातंत्र्यदिनी पुढील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वृक्षारोपण करून जबाबदारी संपणार नाही, तर त्या वृक्षाचे संगोपन करणे, निगा राखणे आपले कर्तव्य आहे. जलवृक्ष चळवळीच्यावतीने या उद्देशाने शहर व तालुक्यात मागील वर्षी लावण्यात आलेल्या ज्या वृक्षाला एक वर्ष पूर्ण झाले, त्या वृक्षाचा शेणाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम दर्यापूर येथे राबविण्यात आला. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला.

माहुली धांडे येथील सरपंच सतीश साखरे व गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाला धोका असणाऱ्या नदीचे खोलीकरण केले. त्या जलसंगोपन उपक्रमाला १५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्या नदीत साठवलेल्या जलाचा पण वाढदिवस जलवृक्ष चळवळीच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे.

माणसाचे वाढदिवस सातत्याने होताना दिसतात, पण जलवृक्षचे वाढदिवस कोणीच साजरे करत नाही. म्हणून जलवृक्ष चळवळीच्यावतीने आम्ही दर्यापूर शहरात मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरे करणार आहोत, अशी प्रतिक्रिया येथील पर्यावरणप्रेमी विजय विल्हेकर यांनी दिली.

टॅग्स :environmentपर्यावरण